पश्चिम महाराष्ट्र

गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान - तेजस्वी सातपुते

प्रवीण जाधव

सातारा - पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलिस दलातील चुकीच्या बाबींना पायबंद घालत नागरिक व पोलिस कर्मचाऱ्यांनाही अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या योजना पुढे चालू ठेवण्याबरोबर अवैध धंदे व राजकीय वरदहस्ताने वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान नूतन पोलिस अधीक्षकांना पेलावे लागेल. 

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली झाल्यानंतर एक ऑगस्ट 2018 ला पंकज देशमुख यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. "मोका' व तडीपारीच्या कारवाया करून संदीप पाटील यांनी वेगळी छाप निर्माण केली होती. मात्र, पोलिस दलांतर्गत असलेल्या खाबूगिरीच्या रोगाला अंकुश लावण्यात त्यांना अपयश आले होते. जिल्ह्याची महत्त्वाची शाखा असो किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात मोठ्या आकड्यांच्या तोडी होत असल्याच्या चर्चा अनेकदा बाहेर पडत होत्या. या चर्चांतील आकड्यांनी लाखोंची काय कोटीची उड्डाणेही पार केली होती. पाटील यांनी भ्रष्टाचारी नसल्याची आपली वैयक्तिक प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले होते. मात्र, त्यांच्या छत्राखाली चाललेल्या अनेक गैरप्रकारांना त्यांना रोखता आले नाही. 

पंकज देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा पोलिस दलाचा आढावा घेतला. त्यामध्ये चांगल्या बाबींबरोबरच चुकीचे काय चालले आहे, याचीही त्यांना बरोबर माहिती मिळाली. कोणत्या झाडाखाली किती पाणी मुरतंय, हेही त्यांनी ओळखले. त्यानुसार पावले टाकत त्यांनी अशा महाभागांभोवती फास आवळायला सुरवात केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. अवैध धंद्यांबाबत तर, त्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यानुसार ते कृती करतील, अशी खात्री अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाली होती. त्यामुळे मलईमध्ये हात भरलेल्या अनेकांनी आपली बदली करून घेण्याचा सपाटा लावला. देशमुखांच्या कडक धोरणामुळे पोलिस दलामध्ये बऱ्याच दिवसांनी चांगला संदेश जायला सुरवात झाली होती. भ्रष्टाचाराच्या गर्तेत न गुंतणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुरूप यायला लागला होता. त्यामुळे निर्माण झालेली ही भीती व चांगल्या कर्मचाऱ्यांतील आशावाद जिवंत ठेवण्याचे आव्हान तेजस्वी सातपुते यांना पेलावे लागणार आहे. 

कडक धोरणांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कामाबाबतचे प्रश्‍न मांडण्याबाबत पारदर्शकता आणण्यासाठीही देशमुख यांनी प्रभावी काम केले. "एम' ऍपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना व्यासपीठ निर्माण झाले. अशा प्रकारचे ऍप नागरिकांसाठीही सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. गुन्हे दाखल होतात. मात्र, ते तपासाविना वर्षानुवर्षे पडून राहतात. त्यामुळे नागरिकांना न्याय कसा मिळणार, हे ओखळून त्यांनी प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांची संख्या राज्यात सर्वांत कमी झाली. अनेक वर्षांपासून केवळ पोलिस व त्यांच्या मुलांसाठी उपलब्ध असणारे पोलिस कवायत मैदान त्यांनी सर्वसामान्य नागरिक व त्यांच्या मुलांसाठी खुले केले. देशात सर्वांत पहिली सर्वांसाठी उपलब्ध असणारी पोलिस क्रीडा अकादमी तयार करण्याचे त्यांचे स्वप्न होते. पोलिस आणि जनतेतील संवाद वाढण्यासाठी हा एक प्रभावी उपक्रम ठरेल. पोलिस व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे हे उपक्रम नवीन अधीक्षक सुरू ठेवतील, अशी अपेक्षा सर्वांना आहे. 

निवडणुकांसाठी खंबीर भूमिका हवी  
आगामी काळात निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. पोलिस दल त्यासाठी सज्ज असतेच. परंतु, खंबीर अधिकारी असला की काम अधिक परिणामकारक होते. त्यामुळे साताऱ्यातील कळीचा मुद्दा असलेला राजकीय समर्थक गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हानही नूतन पोलिस अधीक्षकांपुढे असेल. संदीप पाटील यांनी त्यात प्रभावी काम केले. तीच तडफ नागरिकांना अपेक्षित असणार आहे. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT