Chikungunya is now added to the corona thaman in Sangli district 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या थैमानात आता चिकनगुनियाची भर

अजित झळके

सांगली : एकीकडे कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना जिल्ह्यात चिकुनगुनियाची साथ वेगाने पसरायला लागली आहे. महापालिका क्षेत्रासह गाव, खेड्यांत रुग्ण आढळू लागले आहेत. गंभीर बाब म्हणजे या रुग्णांना तपासण्यासाठी आणि औषधोपचारासाठी पुरेसी वैद्यकीय सेवाच उपलब्ध नाही. त्यामुळे सारे लोक हैराण झाले आहेत. 

जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात चिकुनगुनियाचे किती रुग्ण आहेत, याची अधिकृत आकडेवारी तूर्त वैद्यकीय यंत्रणेकडे नाही. या सर्व व्यवस्थेचे संपूर्ण लक्ष या घडीला कोरोना नियंत्रणाकडे लागलेले आहे. अशावेळी साथीच्या या गंभीर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची मात्र अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांना कोविडची सुविधा उपलब्ध केले आहे. तेथे अन्य तपासण्या जवळपास थांबल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत, अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. प्रचंड अंगदुखी, थांबून थांबून ताप येणे अशा लक्षणाने लोक बेजार आहेत. 

जिल्हा परिषदेकडून या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. आता सध्या तेथे कोरोनाची चाचणी सुरू असल्याने या तपासण्या जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे आकडेवारी उपलब्ध नसली तरी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात शहरी भागातही रुग्णसंख्या मोठी आहे. वसंतदादा शासकीय रुग्णालयात दररोज नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठीही खाटा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. 
या परिस्थितीत डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर झाले पाहिजे. नागरिकांनी घरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. या गंभीर परिस्थितीत आजारी पडणे परवडणारे नाही. वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. त्या कोलमडल्या आहेत. त्यामुळे चिकुनगुनियाच्या अनेक रुग्णांवर घरीच उपचाराची वेळ आली आहे. 

हे करावे... 
* पाणी साचून राहणार नाही याची दक्षता 
* आठवड्यातून कोरडा दिवस पाळावा 
* डास नियंत्रणाच्या उपाययोजना 
* टायरी, टाकावू वस्तू साचू न देणे 
* पाणीसाठे झाकून ठेवणे 

प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व्हे सुरू आहे. त्यातून समोर आलेल्या रुग्णांवर उपचाराबाबत खबरदारी घेतली जात आहे. डास नियंत्रणासाठीही काम सुरू आहे. या घडीला लोकांनी आपली काळजी घ्यावी. पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. डेंगी, चिकुनगुनियापासून बचाव महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायतीने या काळात अधिक खबरदारी घ्यावी. 
- डॉ. शुभांगी अधटराव, जिल्हा हिवताप अधिकारी 


संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT