Child rate have been increased in 14 Districts
Child rate have been increased in 14 Districts  
पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 'स्त्रीजन्मा'चा वाढला टक्का

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : राज्यातील 14 जिल्ह्यांत स्त्रीजन्माचा टक्का वाढला आहे. केंद्र पुरस्कृत 'बेटी बचाओ-बेटी बढाओ' या योजनेमुळे हा बदल झाला असून या योजनेचा आता राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील जालना व हिंगोली या दोन जिल्ह्यांत मात्र प्रमाण घटले आहे. 

जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यांत 2015 पासून ही योजना राबविली जात आहे. ही योजना 2014-2017 या तीन वर्षांसाठी राबवायची होती. पहिल्या टप्प्यात 10 आणि नंतरच्या टप्प्यांत सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालिकेच्या जीवनमानाच्या सुरक्षेची खात्री देणे, बालिकेच्या शिक्षणाबाबत खात्री देणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा समावेश होता, आता केंद्र शासनाने या योजनेत महाराष्ट्रातील आणखीन 19 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यामध्ये सातारा, धुळे, नांदेड, अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी, नंदूरबार, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश केला आहे.

पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भवती मातांची नोंदणी करणे, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती, मुलींचे वाढदिवस साजरे करणे, मुला-मुलींची संख्या सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे व मुलींच्या जन्मदराबाबत पथनाट्यांचे आयोजन या उपक्रमामुळे स्त्रीजन्माच्या दराचा टक्का वाढला आहे. 

पहिल्या टप्प्यातील 16 जिल्ह्यांतील लिंगगुणोत्तर प्रमाण (एक हजार मुलांच्या मागे) 

बीड  922 
जळगाव  903 
नगर  907 
बुलढाणा 939 
औरंगाबाद  929 
वाशिम 906 
कोल्हापूर  893 
उस्मानाबाद  908 
सांगली 924 
परभणी  947 
लातूर  931 
सोलापूर  921 
पुणे  915 
नाशिक 918 
जालना 852 
हिंगोली 869

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT