पश्चिम महाराष्ट्र

कोगनोळी टोलनाक्याजवळ होणार वर्तुळाकार उड्डाणपूल

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी (कोल्हापूर) : राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण आणि आरटीओ चेक पोस्टनाका बांधण्यासाठी पडलेल्या मोठ्या भरावामुळे कागल परिसरातील दूधगंगा नदी काठाच्या गावांना दरवर्षी महापुराला सामोरे जावे लागत आहे. यातच आता कर्नाटक हद्दीत कोगनोळी टोलनाक्यापासून दुधगंगा नदीपर्यंत वर्तुळाकार उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याने पुराच्या धोक्यामध्ये आणखी वाढ होणार आहे.परिणामी ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महामार्गाला सोडून स्वतंत्र पद्धतीने हा उड्डाणपूल होणार असल्याने पुन्हा नव्या भरावामुळे करनूर, वंदूर या गावांना दुधगंगा नदीच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कोगनोळी गावच्या हद्दीतील 20 ते 35 एकर पिकाऊ शेतजमीन व 40 ते 50 व्यावसायिकांना फटका बसणार आहे. कागल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये या उड्डाणपुलामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व कर्नाटक शासनाच्या वतीने हा उड्डाणपूल उभारण्यासाठी उपग्रह सॅटेलाईटद्वारे सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच जमीन संपादन करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत कुणकुण लागल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व एनएचएआयकडे तक्रार केली आहे. तर पुराच्या धास्तीने कागल, करनूर, वंदूर, शंकरवाडी, सिद्धनेर्ली गावाच्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कृती समिती तयार केली आहे.

सहा पदरीकरण महामार्ग आणि सर्व्हिस रस्ते यासाठी भरपूर जागा दोन्ही बाजूस शिल्लक असताना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेला लागून हा उड्डाणपूल कशासाठी, हा प्रश्न समोर आला आहे. वळसा घालून उड्डाणपूल महामार्गाला मिळणार कोगनोळी गावच्या जवाहर कारखान्याच्या ऑफिसपासून उड्डाणपूलाची सुरुवात होईल. कोगनोळी फाट्यावर महामार्गावरून करनूरकडे जाणाऱ्या बाबासाहेब पाणंद येथून वळसा घालून जयसिंग पवार यांच्या घराजवळून दूधगंगा नदीजवळ जाऊन महामार्गाला मिळणार आहे. कोगनोळीकडील बाजूला सरळ पुल आहे. त्यासाठी मोठे बांधकाम होणार आहे.

सध्या दूधगंगा नदीचे पाणी घरापर्यंत येत आहे. शेती पाण्याखाली जात आहे. आता नवीन उड्डाणपूल झाल्यावर काय अवस्था होईल, सांगता येत नाही. शेतकरीवर्गाची 50 ते 60 एकर जमीन या प्रकल्पामुळे जाणार आहे. अनेकांची घरे यामध्ये जाणार आहेत. त्यामुळे पुलाबाबत फेरविचार करावा.

-सुनील माने,ग्रा. पं. सदस्य, कोगनोळी

शासनाकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे उ़ड्डाण पुलाची योजना आखली जाईल. सध्या फक्त नकाशे आले आहेत‌.

-कमलेश, सहाय्यक अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बेळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara: देशात भाजप असताना कॉक्रोच जनता पक्षाची गरज काय? आठवले म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही

Pandharpur: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज, संवर्धनाच्या कामासाठी २३,२४ जूनला दर्शन पूर्ण बंद

Satara: महायुतीत खदखदीची चर्चा, कऱ्हाडात भाजप प्रदेशाध्यक्षांची बैठक; मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ

INDW vs PAKW: भारताची टी-२० वर्ल्डकप मोहीम आजपासून; आज भारत-पाक आमनेसामने, कशी असेल Playing 11

पाण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भाजप कार्यकर्त्याची हातोड्यानं ठेचत हत्या, २ सख्खे भाऊ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT