jayant patil
jayant patil 
पश्चिम महाराष्ट्र

दोन्ही कॉंग्रेसचे एकमत - जयंत पाटील

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन जागा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार चंद्रपूर, अमरावती, परभणी या तीन जागा कॉंग्रेस लढवेल आणि कोकण, नाशिक आणि बीड-उस्माबाद-लातूर या तीन जिल्ह्यांतील एक अशा तीन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवेल. लोकसभेची पालघरची जागा कॉंग्रेस आणि गोंदियाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 

श्री. पाटील यांनी आज यशवंतराव चव्हाण आणि पी. डी. पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, ""कॉंग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. त्यानुसार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन आणि लोकसभेची प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. सरकारचे नाकर्तेपणाचे धोरण, खोटी आश्‍वासने याविरुद्ध केलेल्या हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. साडेतीन वर्षांच्या काळानंतर राज्यासह देशात चित्र बददले आहे. ज्या सरकारला पारदर्शी कारभार करून सत्तेवर येण्याची इच्छा होती, त्या सरकारवर आरोप झाले आहेत. त्यामुळे लोकांचे मन बदलले आहे. कणखर विचारावर आधारित पक्ष उभा करायचा आहे. त्यासाठी बूथ समिती, ग्राम समितीला प्राधान्य देणार आहे.'' 

पलूसमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाही 
पतंगराव कदम यांच्या निधनाने पलूस विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार देणार नाही. ती जागा कॉंग्रेस पक्ष लढवेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांना मदत करेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 
शिवसेनेने विधान परिषदेसाठी भाजपला मदत केली आहे, या मुद्‌द्‌यावर श्री. पाटील म्हणाले, की शिवसेना बोलते तसे वागत नाही. धड विरोधी पक्षातही नाही आणि सत्तेतही नाही, अशी त्यांची स्थिती आहे. 

साखर उद्योग मोडीत निघेल 
केंद्र सरकारने साखर कारखान्यांना सध्या दिलेली मदत कमी आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, ""साखर निर्यात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर आणि सध्याचे दर यामध्ये फरक आहे. तो भरून निघाला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने हे अनुदान वाढवले पाहिजे. राज्य सरकारनेही त्यात भर घालून वाढ करण्याची गरज आहे. सध्या साखरेचे दर कमी झाले आहेत. ही स्थिती अशीच राहिली, तर साखर उद्योग मोडीत निघेल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT