पश्चिम महाराष्ट्र

मळेगाव येथे बंधारा पाडून नुकसान

बाबासाहेब शिंदे

पांगरी : पाणी आडवा पाणी जिरवा हे उद्दीष्ट ठेवून शासन ग्रामीण भागातील ओढ्यावर बंधारे बांधत आहे. मात्र, मळेगाव (ता.बार्शी) येथे सिमेंटचा बांधलेल्या बंधाऱ्याची मुख्य भिंत तिघांजणांनी पाडून त्यामध्ये पाणी साठा होऊ नये म्हणून नुकसान केल्याची घटना ता.8 ते 10 जूनच्या सांयकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. ऋषी अविनाश इंगोले, जरीचंद विठोबा इंगोले, जहांगिर कोतवाल (रा. सर्व मळेगाव)असे गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीचे नावे आहेत. 

याबाबत जिल्हा परिषद उपविभागीय जलसंधारण अधिकारी
 मच्छिंद्र मारूती सोनवणे (रा.बार्शी) पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. जलसंधारण उपविभागामार्फत ग्रामीण भागातील ओढ्यावर व नदीवर बंधारे व पाझर तलावाच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा आदी कामे केली जातात. त्याप्रमाणे सन 2015-16 मध्ये मळेगाव येथील शेतकरी जहांगिर कोतवाल व ऋषी अविनाश इंगोले यांचे गट नं.461 मधील ओढ्यावर सिमेंटचा बंधारा क्र 4 बांधून तयार करण्यात आला. त्यामुळे आजूबाजूच्या शेतीला पाणीपुरवठा करणारे विहीरीतील पाण्याची पातळी वाढली होती. मात्र या बंधार्याची भिंत ऋषी अविनाश इंगोले, जरीचंद विठोबा इंगोले, जहांगिर कोतवाल (रा.मळेगाव)यांनी बंधार्यात पाणी साठा होऊ नये या उद्देशाने बंधार्याची मुख्य भिंत पाडून नुकसान केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस पांडूरंग मुंढे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Deputy Mayor : मुंबईच्या उपमहापौरपदासाठी महायुतीकडून कुणाचं नाव? अमित साटम यांनी केली घोषणा; वाचा...

Indian Railways Rule : रेल्वे प्रशासनाचा नवा नियम, प्रवासात ओळखपत्र नसल्यास सर्वांना दंड; काय आहे रूल

एक WhatsApp मेसेज अन् बँक अकाऊंट रिकामंं; 'या' धोक्यापासून वाचण्यासाठी पटकन ऑन करा 'ही' सेटिंग, आत्तापर्यंत लाखो लोक फसलेत जाळ्यात

Yogi Adityanath: योगी पुन्हा पोहोचले आपल्या शाळेत! २ कोटींच्या आलिशान इमारतीचं केलं लोकार्पण; CM धामींच्या कामाचंही केलं कौतुक

Who Is Ritu Tawade: २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर, कोण आहेत रितू तावडे?

SCROLL FOR NEXT