वरचे घोटील - आगीत घर जळून खाक झाल्याने जळीतग्रस्त सहा कुटुंबांनी गोठ्यात संसार मांडला आहे.
वरचे घोटील - आगीत घर जळून खाक झाल्याने जळीतग्रस्त सहा कुटुंबांनी गोठ्यात संसार मांडला आहे. 
पश्चिम महाराष्ट्र

आगीत उद्‌ध्वस्त कुटुंबांचा संसार गोठ्यात!

राजेश पाटील

ढेबेवाडी - घराला लागलेल्या भीषण आगीत उघड्यावर आलेल्या वरचे घोटील (ता. पाटण) येथील सहा कुटुंबांवर जनावरांच्या गोठ्यात संसार मांडायची वेळ आली आहे. घटनेनंतर त्यांची विझलेली चूल पेटविण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले असले तरी शासनाकडूनही तातडीने घरकुले बांधून मिळावीत, अशी त्यांची मागणी आहे. याप्रश्‍नी आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून शासकीय पातळीवर वेगवान पाठपुरावाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

गवत आणि तुटके पत्रे टाकून बाहेर उभारलेल्या मांडवात जनावरांना बांधून सहा कुटुंबानी गोठ्यात चुली मांडल्या आहेत. भांडी आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी गव्हाणीचा वापर केला जात आहे. आयुष्यभर काडीकाडीने उभारलेला संसार आगीत जळून खाक झाल्याने बसलेल्या जबर मानसिक धक्‍क्‍यातून पवार कुटुंबिय अजूनही सावरलेले नाहीत. प्रत्येकजण घरात सुन्नपणे बसून आहे. संसार जळाल्याच्या धक्‍क्‍याने अन्न, पाणी वर्ज्य करून अंथरूण धरलेल्या या कुटुंबातील इंदुबाई पवार (वय ६०) यांचे नुकतेच निधन झाल्याने पवार कुटुंबीयांच्या दु:खाला पारावर उरलेला नाही. या कुटुंबातील अधिक व प्रेम ही मुले गावातील प्राथमिक शाळेत तर छोटा श्री अंगणवाडीत शिकतो. तिघांचेही दप्तर, अभ्यासाची वह्या, पुस्तके व अन्य शालेय साहित्य आगीत जळाल्याने ते रिकाम्या हाताने शाळेत जातात. वर्गमित्रांची पुस्तके घेऊन अभ्यास करतात. शेतीवर या कुटुंबांची उपजीविका चालते. अहोरात्र मेहनत करून पिकविलेल्या दोन वर्षांच्या धान्याचा आगीत कोळसा झाल्याने त्यांच्या कष्टावरच पाणी फिरले आहे. 

सध्या कडाक्‍याच्या थंडीत या कुटुंबांतील महिला जनावरांच्या गोठ्यात तर पुरुष मंडळी जनावरे बांधण्यासाठी आणि चारा ठेवण्यासाठी असलेल्या जवळच्याच दुसऱ्या एका शेडमध्ये रात्र उजाडत आहेत. तीन आठवडे उलटूनही वीज कंपनीकडून प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे आलेला नाही. उलट त्यांच्याकडून हात झटकणे सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. या कुटुंबांतील मारुती पवार यांच्या दूध डेअरीचे सर्व साहित्य आगीत जळून खाक झाल्याने गावकऱ्यांनी त्यांना आधार देत पुन्हा दूध संकलन सुरू करायला लावले आहे. आमदार देसाई यांच्याकडून या कुटुंबांच्या घरकुलांसाठी वेगवान पाठपुरावा सुरू आहे. त्याशिवाय तात्पुरत्या निवाऱ्यासाठी स्वतःतर्फे त्यांनी पत्र्यांची मदत टेंपातून पाठवून दिली आहे. अतिपावसाचा हा परिसर आहे. पावसाळ्यापूर्वी या कुटुंबांचे निवारे उभे राहण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT