WNT20A00160 
पश्चिम महाराष्ट्र

रोपे वाटून उत्तर कार्य 

एन. जी. पाटील

वारणावती (सांगली) ः चरण (ता. शिराळा) येथील पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब नायकवडी यांनी भावाच्या उत्तर कार्य विधीवेळी पाहुण्यांना रोपांची भेट दिली आणि पर्यावरण संवर्धनचा संदेश दिला. नायकवडी यांनी आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे नातेवाईकांनी कौतुक केले. 


चरण (ता. शिराळा) येथील नायकवडी कुटुंबीय हे पंचक्रोशीतील सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे कुटुंब. स्वातंत्र्य चळवळीपासून आजही नायकवडी कुटुंबीय चळवळीत सहभागी होत आहेत. 


पद्‌मभूषण कांतिवीर डॉ. नागनाथआणा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब नायकवडी यांनी सामाजिक, राजकीय, धरणग्रस्तांच्या चळवळीत मोठे व दीर्घकाळ काम केले आहे. त्याच नायकवडी कुटुंबातील कारभारी म्हणून परिचित असलेले बाबूराव नायकवडी यांचे चार मे रोजी 78 व्या वर्षी निधन झाले. डोंगरी भागातील लोकांना त्यांच्या निधनाने शोक अनावर झाला. त्यांच्या रक्षाविसर्जनावेळी चिमुटभरही रक्षा विसर्जित करू न अस्थी नदीत न सोडता रक्षा "कारभारी' यांनी मातीत परिश्रम घेतले. संसाराचा गाडा चालवला त्या मातीतच विसर्जिन करण्यात आल. त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून झाडांना रक्षा अर्पण करण्यात आली.


दरम्यान, उत्तर कार्यात पाहुण्यांना भेट म्हणून भांड्याची किंवा अन्य वस्तू देण्याची पध्दत आहे. त्याऐवजी पर्था परंपरा बनलेल्या गोष्टींना फाटा देऊन नायकवडी कुटुंबातील बाळासाहेब यांनी रोपे वाटप करून एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवला. भावाच्या मृत्यूनंतर त्यांचे नाव नातेवाईकांत कायम स्मरणात राहील. या उपक्रमाबद्दल त्यांचे व कुटुंबियांचे कौतुक होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT