पश्चिम महाराष्ट्र

"शाळासिद्धीत' जिल्हा परिषद राज्यात अव्वल 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - शाळासिद्धी अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या www.shalasiddhi.org या संकेतस्थळावर 28 फेब्रुवारी 2017 अखेर देशातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन तसेच स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 3 हजार 683 शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. यापैकी 610 शाळा "अ' श्रेणीत आहेत. एकंदरीत राज्यभरातील उपलब्ध शाळांपैकी "अ' श्रेणीतील शाळा असण्याचे कोल्हापूरचे शेकडा प्रमाण (16.55 %) हे राज्यात अव्वल असून, कोल्हापूरने आणखी एकदा गुणवत्तेत आपले स्थान अधोरेखित केले आहे. 

राज्य शासनाने 30 मार्च 2016 ला शाळासिद्धी शासन निर्णय घेऊन सर्व शाळांनी शाळासिद्धी कार्यक्रम राबविणे अनिवार्य केले. यामध्ये शाळेने त्यांच्या स्व-सुधारणेसाठी उपाययोजना व त्यासाठी सक्षम पाऊल उचलणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश. शाळासिद्धीच्या 7 मानकांनुसार 45 उपक्षेत्रात स्वत:च्या शाळेचे स्वयंमूल्यमापन 999 गुणांपैकी करावयाचे बंधनकारक होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाच्या 7 मानकांनुसार तालुका, केंद्र व शाळानिहाय अंमलबजावणीचे भरीव नियोजन केले. पहिला टप्पा म्हणजे जुलै 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यनिर्धारक यांच्या सहकार्याने शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर डाएट येथे प्रत्येक तालुक्‍यातून कृतिशील शिक्षकांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये शाळासिद्धीची 7 मानके व त्यानुसार उपक्रम व कार्यक्रम कसे विकसित करायचे यावर चर्चा केली. त्यानुसार प्रत्येक तालुक्‍यातून मुख्याध्यापकांनी क्षेत्रनिहाय कोणते अभिलेख ठेवायचे, तसेच पुरावे ठेवावयाचे याचे मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत केले गेले. 

जिल्ह्यातील 1012 शाळा या "ब' श्रेणीत आहेत. उर्वरित 919 "क' श्रेणी व 628 "ड' श्रेणीत आहेत. या स्वयंमूल्यमापनानंतर विद्या परिषद, पुणे यांचेकडून "अ' श्रेणीतील शाळांचे बाह्यमूल्यमापन होणार असून, त्यासाठी 2000 पेक्षा अधिक निर्धारक राज्यभरातून प्रशिक्षित केले आहेत. शाळा बदलून हे निर्धारक बाह्यमूल्यमापन करणार आहेत. ही प्रक्रिया 10 एप्रिलनंतर करण्याचे नियोजित आहे. स्वयंमूल्यमापनात ज्या शाळा "अ' श्रेणीत आहेत, त्यांचेच बाह्यमूल्यमापन होईल. 

वैधता पाच वर्षे कायम 
प्रत्येक शाळेला निर्धारक भेट देऊन 2 दिवस पुरावे, अभिलेखे यांची पडताळणी करून गुणदान विद्या परिषदेकडे गोपनीय स्वरूपात संकेतस्थळावर देतील. यानंतर पात्र शाळांना SS2016 असे प्रमाणपत्र शासनाकडून दिले जाईल, ज्याची वैधता 5 वर्षे असेल. 5 वर्षांनंतर बदलता शिक्षणप्रवाह व गरजानुरूप 7 मानकांत बदल केले जातील व त्या वेळी पुन्हा असे मूल्यमापन करणे बंधनकारक राहील. शाळासिद्धी राष्ट्रीय मूल्यांकनाच्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल राहील व शाहूंचा शिक्षण वारसा जोपासला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT