chandrakantdada patil.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

केंद्राकडे बोट दाखवू नका, आधी मदत करा : चंद्रकांतदादांचा चिमटा...ग्रामीण भागात मोठे नुकसान 

बलराज पवार

सांगली- अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी राज्य शासनाने तातडीने मदत करावी नंतर केंद्राकडून मदत मागावी, असा चिमटा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला. 

सांगलीत पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, आमची सत्ता असताना सरसकट कर्जमाफी, महापुराच्या काळात दहा हजार कोटींची मदत केली होती. नंतर केंद्राकडून मदत मागितली. त्यावेळी सहा हजार 800 कोटी रुपये मिळाले. काही नुकसान सोसावे लागले. पण आधी आम्ही खर्च केले. मात्र सध्याचे सरकार कोरोना महामारी नंतर निसर्गवादळ अशी कारणे सांगून वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवते. त्यापेक्षा राज्य शासनाने आधी कागदावर आपल्याला नेमकी कशी मदत पाहिजे, किती मदत पाहिजे त्याचे नियोजन करावे. नंतर केंद्राकडे निधी मागावा. कोरोना महामारीच्या काळात जे दिले ते केंद्राने दिले आहे. पीपीई किट, व्हेंटिलेटर आदी सर्व मदत केंद्राने केली आहे असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले. 
"ईडी'चा संबंध नाही 

जलयुक्त शिवार घोटाळ्यातील चौकशीचा निर्णय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीकडून चौकशी होण्याच्या वृत्ताबद्दल बोलताना ते म्हणाले, जलयुक्त शिवार आणि ईडीचा काही संबंध नाही. कॅगने दिलेल्या अहवालावरून जलयुक्त शिवारची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांनी चौकशी करावी. त्यात जे समोर येईल त्यावर कारवाई करावी. 


मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, आम्ही मागे लागल्यामुळे ते घराबाहेर पडत आहेत. घराबाहेर पडून बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केल्याशिवाय भरपाई देऊ शकत नाही अशी मागणी केली. त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडत आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT