drought
drought 
पश्चिम महाराष्ट्र

दुष्काळाने दिवाळी सणाचा उत्साह हिरावला !

सूर्यकांत नेटके

नगर : शेती उत्पादनात घट, आर्थिक स्थिती खालावलेली आणि जनावरे जगवण्यासाठी यंदा गाव सोडावे लागल्याने भर दिवाळीत ग्रामीण भागात गावे ओस पडल्याने यंदाच्या दिवाळी सणावर दु्काळाचे गंभीर सावट दिसत आहे. बाजार पेठेवर त्याचा परिणाम झाला असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा चाऴीस टक्क्यापर्यत उलाढाल कमी झाली. पोटापाण्यासाठी दुरदेशी गेलेले चारकरमानीही यंदा फारसे गावांकडे फिरले नाहीत. दुष्काळाने यंदा प्रत्येकांच्या चेहऱयावरील आनंद हिरावल्याचे स्पष्टपणे जानवत आहे. 

शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. शेती-माती समाधानी असली तर दिवाळी सणाचा उत्साह गावखेड्यात अधिक असतो. यंदा मात्र नगर जिल्ह्यासह बीड, लातूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, सोलापुर, सांगली, सातारा, भागात उत्साहाची तीव्रता अधिक आहे. विदर्भ, जळगावातही पाऊस नसल्याचा गंभीर परिणाम झाला आहे. विशेषतः कोरडवाहू, कापसाचे उत्पादन घेतल्या जाणाऱया भागातच यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे.

यंदा जवळपास सर्वच भागात कापसाचे साठ ते 80 टक्के उत्पादन घटले आहे. खरीपाची पीके गेली तर रब्बीची पेरणी नाही, त्यामुळे सण साजरा करण्यापेक्षा जगणे महत्वाचे समजून अनेक मजुरांनी, शेतकऱयांनी गाव सोडले असून त्याचे गंभीर परिणाम दिवाळी सणावर स्पष्टपणे दिसत आहेत. गावखेड्यातील तरणे लोक मजुरासाठी गेल्याने वयस्क माणसेच गावांत राहिली आहेत. वर्षभर काम-धंद्यासाठी दुरदेशी गेलेले चाकरमानी दिवाळीला दरवर्षी गावी येतात, यंदा गावीच काही नाही तर जायचे कशाला असे समजून अनेकांनी ग्रामीण भागात येणे टाळले आहे. 

उलाढाल घटली..
ग्रामीण भागात दिवाळी सणाला कपडे, किराणा यासह नवीन वाहने, सोने, शेती खरेदी करण्याची अनेक भागात परंपरा जोपासली जाते. नवीन दुकाने सुरु करण्यालाही प्राधान्य दिले जाते. बहूतांश लोकांनी यापरंपरेला छेद दिला आहे. एक तर ऐन दिवाळी मजुरांनी घर सोडले, आहेत त्यापैकी साधारण पन्नास टकके लोकांनी खरेदी कपड्याची खरेदी केली नाहीत. किराणा खरेदीला कात्री लावलेली दिसत आहे. नवीन दुकाने सुरु करणाऱयांची संख्या अल्प आहे. नवीन व्यवहारही होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसाधारण उलाढालीत पन्नास टक्के घट झाल्याचे व्यवसायीक सांगतात. 

शेती उत्पादन चांगले निघाले तर दिवाळी साजरी करण्याला आनंद असतो. यंदा शेतीत काही पिकले नाही. ग्रामीण भागात दिवाळीत शेतकऱयांच्या माध्यमातूनच बरयापैकी उलाढाल होत असते. यंदा शेतकरयांच्या खिशातच पैसा नाही, तीव्र दुष्काळ पडलाय तर दिवाळी साजरी कशी करणार.
- सचिन काळे, शेतकरी, राशीन (जि. नगर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT