कऱ्हाड - सहकारी संस्थामुळे महाराष्ट्र भरभराटीला आला आहे. राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे 60 वर्षावरील आहेत. देशाची भावी पिढी म्हणजेच युवक सहकारी संस्थांत आले पाहिजेत, यासाठी 18 ते 25 वयोवगाटातील जास्तीत जास्त युवकांना सहकाराच्या प्रवाहात आणण्यात येणार असुन त्यासाठी शासनपातळीवर धोरण घेण्यात येणार आहे. त्या माध्यमातून 18 ते 15 वयोवगटातील युवकांच्या सहकारी संस्थाही स्थापन करण्यासाठी विशेष बाब म्हणुन परवागनी देण्यात येईल, अशी घोषणा सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांनी आज येथे केली.
कऱ्हाड (जि. सातारा) येथील बापुजी साळुंखे महाविद्यालय आणि सहकार भारतीच्यावतीने आयोजित ग्रामीण विकासात सहकाराचे योगदान या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, अर्थतज्ञ डाॅ. जे. एफ. पाटील, बुलढाणा अर्बन बॅंकेचे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सहकारी संस्थात बहुतांश सभासद हे 60 वर्षाच्यावरील आहेत. युवकांना या संस्थामध्ये सभासद करुन घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी 18 ते 25 वयोगटातील जास्तीत जास्त युवकांना सभासद करुन घेवुन सहकाराच्या प्रवाहात आणणार असल्याचे मंत्री श्री. देशमुख यांनी जाहीर केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.