The farmers are in trouble because of no rain and disease
The farmers are in trouble because of no rain and disease 
पश्चिम महाराष्ट्र

न पडलेला पाऊस व हुमणीमुळे शेतकरी अडचणीत

सकाळवृत्तसेवा

मोहोळ : चालू गळीत हंगामात मोहोळ तालुक्यातील भिमा, जकराया व लोकनेते या 3 साखर कारखान्यांच्या माध्यमातून साडे चौदा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 14 लाख 66 हजार पोती साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र न पडलेला पाऊस व हुमणीमुळे एकरी ऊसाचा उतारा अत्यंत कमी निघाला. त्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत आला आहे. पुर्ण अर्थकारण कोलमडले आहे. कमी गाळप क्षमता असलेल्या लहान साखर कारखान्यामध्ये अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याने उच्चांकी गाळप करुन जिल्ह्यात वरच्या क्रमांकावर स्थान पटकाविले आहे.

चालू पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने खोडवा उसाची वाढ झाली नाही. त्याला खते ही टाकता आली नाही, त्यामुळे तो जास्त वाढला नाही. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हटल्याप्रमाणे उभ्या ऊसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने वजनात मोठी घट झाली होती. अपेक्षेप्रमाणे धरलेल्या उत्पन्नाच्या निम्मेच पैसे हातात आल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे आता पुढचा काळ कसा घालवायचा, याची चिंता त्यांना पडली आहे.

वटवटे ता. मोहोळ येथील जकराया साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात 4 लाख 40 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 4 लाख 40 हजार पोती साखर उत्पादन केले आहे. शासनाने मध्यंतरी साखर कारखान्यासाठी काढलेल्या योजनेच्या माध्यमातून बी हेवी इथेनॉल उत्पादन केले. एकूण 25 लाख लीटर उत्पादन झाले असून प्रतिलीटर 52 रूपयांप्रमाणे दर मिळाला. चालू हंगामात कारखान्याने सह विज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून 2 कोटी 59 लाख यूनिट विज निर्मिती केली आहे. त्यापैकी 1 कोटी 19 लाख यूनिट विज महावितरणला विकली असल्याचे या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली.

अनगर ता. मोहोळ येथील लोकनेते साखर कारखान्याने 6 लाख 57 हजार 464 में टन उसाचे गाळप करून 6 लाख 84 हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात 3 कोटी 4 लाख यूनिट विज निर्मिती केली आहे. तर पुढील महिन्यापासून इथेनॉल प्रकल्प सुरु करणार असल्याचे या कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटिल यांनी सांगितले.

टाकळी सिकन्दर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण झाले आहे. तसेच सहविज निर्मिती प्रकल्प ही सुरु झाला आहे. त्या माध्यमातून 93 लाख यूनिट विज निर्मिती केली आहे. चालू हंगामात कारखान्याने 3 लाख 47 हजार में टन उसाचे गाळप करून 3 लाख 41 हजार 800 पोती साखरेचे उत्पादन केले आहे. चालू हंगामातच कारखान्याने नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून उसाचे गाळप केले आहे. त्यामुळे भविष्यातील अतिरिक्त ऊसाची अडचण निकालात निघाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT