Farmers Strike
Farmers Strike 
पश्चिम महाराष्ट्र

'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''

सकाळवृत्तसेवा

पुणतांबे : 'शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही; तो सुरूच आहे. ठरल्याप्रमाणे सोमवारी (ता. पाच) 'महाराष्ट्र बंद'चे आवाहन कायम आहे. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील,' असे शेतकऱ्यांनी आज (शनिवार) जाहीर केले. 

संप मागे घेण्याची घोषणा करणाऱ्या किसान क्रांतीच्या 'कोअर कमिटी'चा शेतकऱ्यांनी निषेध केला. गावात दोन महिन्यांपासून संपाची तयारी केली जात होती. त्यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. 'कोअर कमिटी'ने मात्र संप मागे घेऊन शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रामुख्याने जयाजी सूर्यवंशी व अन्य सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साटेलोटे करून संप मिटविल्याचा आरोप जमलेले शेतकरी करीत होते. 

धनंजय जाधव, सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शेतकरी त्यांना दिवसभर दूरध्वनी करीत होते. त्यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे 'कोअर कमिटी'चे सदस्य भूमिगत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, विजय धनवटे, अनिल नळे, बाळासाहेब भोरकडे आदींनी 'कोअर कमिटी'वर विविध आरोप केले. 

राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पटारे यांनी येथे येऊन संपाला शिवसेनेचा पाठिंबा कायम असेल, संप असाच सुरू राहील, अशी भूमिका मांडली. धनंजय जाधव यांचे बंधू माजी सरपंच सर्जेराव जाधव 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, की सात-बारा कोरा झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही. आपण संपात सहभागी आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT