पश्चिम महाराष्ट्र

मैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्‍यातून तरुणाची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - राजारामपुरीतील फ्लॅटमध्ये पंख्याला दोरीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला. श्रीराम संजय कोळी (वय १९, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली, मूळ रा. गोंदवले, ता. माण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यात मैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्‍यातून जीवन संपवत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. याची नोंद राजारामपुरी पोलिसांत रात्री उशिरा झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोंदवले (जि. सातारा) येथील श्रीराम कोळी बारावीत शिकत होता. त्याचे वडील डॉक्‍टर आहेत. त्याची बहीण तेजश्री या इंजिनिअर असून, कोल्हापुरातील एका खासगी कंपनीत  नोकरी करतात. ते दोघे सहा महिन्यांपासून राजारामपुरी पाचव्या गल्लीतील एका अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहतात. श्रीरामचा आज बारावीचा माहिती तंत्रज्ञान विषयाचा शेवटचा पेपर होता.

परीक्षेला जाण्यापूर्वी त्याने बहिणीकडून तीनशे रुपये घेतले. त्यानंतर तो पेपरला निघून गेला. पेपर सुटल्यानंतर तो घरी गेला. दुपारी तीनच्या सुमारास बहिणीने त्याला पेपर कसा गेला याची विचारणा केली. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या घरी गेल्या. त्यांनी श्रीरामला हाका मारल्या; मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले. त्यावेळी त्यांना श्रीरामने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याचा त्यांना धक्का बसला. त्या मोठ्याने ओरडू लागल्या. हे ऐकून अपार्टमेंटमधील रहिवाशांसह, माजी महापौर तृप्ती माळवींसह परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दरवाजा तोडून काढला. दरम्यान, याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

कोणालाही जबाबदार धरू नये...
माझ्या मैत्रिणीने काही दिवसांपासून माझ्याशी बोलणे टाळले. तिला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. परीक्षा संपल्यानंतरही आज तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र ती बोलली नाही. तिच्यावाचून मी जगू शकत नाही. मी माझे जीवन संपवून घेत आहे. आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असा श्रीरामने लिहिलेल्या चिठ्ठीत मजकूर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT