Marriage card
Marriage card 
पश्चिम महाराष्ट्र

लग्नपत्रिकेव्दारे बेटी बचाव, पर्यावरण, पाणी बचतीचे संदेश 

सकाळवृत्तसेवा

वाळवा : "बेटी बचाव'ची मोहिम शासकीय, सामाजिक पातळीवर कितीही प्रभावी पणे राबवायची म्हटले तर प्रत्यक्ष कुटुंबातील सहभागा शिवाय ही मोहिम यशस्वी व्हायला मर्यादाच आहेत.

मुला-मुलींच्या जन्म दरातील अंतर कमी होत असले तरी अजून ही अपेक्षीत चित्र पाहायला मिळत नाही. विविध स्तरांवर आपआपल्या परीने "बेटी बचाव'चा नारा कमी-अधीक प्रमाणात घुमतो आहे. मात्र कौटुंबीक पातळीवर अजूनही मुलग्यासाठी आग्रह दिसतो आहे. 

येथील जनार्दन भागवत माळी यांनी आपल्या मुलीच्या विवाह पत्रीकेव्दारे मुलगी वाचवा, पर्यावरण रक्षण, पाणी बचत या मोहिमांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. माळी यांच्या मुलीच्या विवाह पत्रीका म्हणजे प्रत्यक्षात प्रबोधन पत्रीका ठरली आहे. विवाहाच्या निमंत्रणाबरोबरच सामाजिक स्तरावर मुलगी वाचवा सारख्या मोहिमेसाठी कुटुंबे जागृत झाली पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला आहे. आई, बहिण, बायको पाहिजे.. मग मुलगी का नको.., हा संदेश ठळक पणे पत्रीकेवर आहे. पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचतीचा संदेशही पत्रीकेवर बोलक्‍या स्वरुपात आहे. एकूणच कौटुंबीक स्तरावरुन मुलगी वाचली पाहिजे म्हणून सुरवात होत असल्याचे ही विवाह पत्रीका स्पष्ट करते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT