GODAVARI CANOL 
पश्चिम महाराष्ट्र

गोदावरी कालव्यांना १२ एप्रिलपासून आवर्तन

सकाळ वृत्तसेवा

राहाता : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सिंचन व पिण्यासाठी दारणा व गंगापूर सामूहिक धरण प्रकल्पामधून 12 एप्रिलपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून हे आवर्तन 15 एप्रिलपासून सुरू होईल. हे आवर्तन 22 दिवस चालेल, अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.

विखे पाटील म्हणाले, ""राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे राज्यात लॉकडाउन आहे. त्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 मधील जमावबंदी आदेशाचे पालन लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांनी करून जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवर्तन सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे.

हे आवर्तन लाभक्षेत्रातील अधिकृत लाभधारकांना फळबाग, बारमाही पिके, हंगामी पिकांसाठी असल्याने पाण्याचा शेतकऱ्यांनी जपून वापर करावा. धरणातील पाण्याची उपलब्धता आणि वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आवर्तन सुरळीत पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.'' 
दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. शिंदे यांनी आज आवर्तनाबाबतचे प्रकटन जाहीर केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT