Good news: Sugarcane workers from Marathwada, Vidarbha on their way back 
पश्चिम महाराष्ट्र

गुड न्यूज ःमराठवाडा, विदर्भातील ऊसतोड कामगार परतीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा

नगर : बीड, धुळे, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ आदी 14 ठिकाणांहून कामगार ऊसतोडणीसाठी कोल्हापूरला गेले होते. तेथील कारखान्यांचे गळीत संपल्याने सर्व कामगार गावाकडे परतीच्या मार्गावर असताना अचानक लॉकडाउन जाहीर झाले. त्यामुळे त्यांना प्रशासनाने तेथेच थांबवून धरले होते. गावाकडे परतण्यासाठी कामगारांची धडपड सुरू होती. अखेर एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगारातून 50 बसद्वारे 1150 कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. 
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यवहारांसह वाहतूक बंद झाली. त्यात बीड, धुळे, भूम, माजलगाव, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बुलडाणा, कारेगव्हाण, पिंपळनेर, पाटोदा, पाथरूड, परळी येथून आलेले ऊसतोड मजूर अडकले होते.

घरी जाण्याची ओढ त्यांना लागली होती. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना एकाच जागी थांबण्यास सांगण्यात आले होते. अखेर त्यांना घरी परत पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. कोल्हापूरमधील साखर कारखाना व्यवस्थापनाने साखर कार्यालयाशी, नंतर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडून एसटी प्रशासन असा पत्रव्यवहार केला. त्यामुळे ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावात सोडण्यासाठी एसटी बस उपलब्ध झाल्या. बीड, यवतमाळ, हिंगोलीसह 14 ठिकाणच्या ऊसतोड कामगारांना 50 बसमधून घरी सोडण्यात आले. प्रत्येक बसमध्ये फक्त 23 जणांना बसविण्यात आले होते. 

ऊसतोड कामगारांना गावी सोडण्यासाठी प्रशासनाने बसची मागणी केली होती. त्यानुसार 50 बस उपलब्ध करून दिल्या. त्यातून सर्व ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावात नेऊन सोडण्यात येत आहे. 
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

Amboli Ghat Accident: 'आंबोली घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळला'; ब्रेक निकामी झाल्याने दुर्घटना, चालक सुखरूप

Nashik Central Jail : नाशिक कारागृहात 'ॲलन कार्ड' घोटाळा: शिपाई आणि बंदीविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT