voting card.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

खुषखबर..! मतदारांना नविन ओळखपत्र मिळणार

सकाळवृत्तसेवा

सांगली-भारतीय निवडणूक आयोगाने यंदा नव्याने निवडणूक ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वितरीत केलेली "एमटी सिरिज' ओळखपत्रे 16 अंकी आहेत. आता त्याचे रुपांतर 10 अक्षरांक नुसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांना वर्षा अखेरीस नव्याने ओळखपत्र मिळणार आहेत. 


याबाबत सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा उप सचिव अ. ना. दळवी यांनी प्रशासनाला माहिती दिली आहे. निवडणूक ओळखपत्र खराब झालेले मतदार तसेच गहाळ झालेल्यांसाठी ही चांगली बातमी आहे. मतदारांना यापूर्वी निवडणूक ओळखपत्रे दिल्याला 25 ते 28 वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यातील बहुतांश लोकांची ओळखपत्रे खराब झालेली आहेत.

छायाचित्र ओळखू येत नाही. यातील अनेक ओळखपत्र एसटीच्या प्रवासात वापर होताना त्यांची स्थिती लक्षात येते. त्यानंतर जस-जशी मतदार नोंदणी झाली. त्यांना नव्याने ओळखपत्रे देण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर संबंधित गावांतीस सर्व मतदारांना नव्याने ओळखपत्रे देण्यात आलेली आहेत. त्यानंतर आता सर्व मतदारांना पुन्हा नव्याने ओळखपत्र मिळणार आहेत. 


भारतीय निवडणुक आयोगाने घेतलेल्या निर्णयाची माहिती राज्य निवडणुक आयोगाने सर्व जिल्ह्याना लेखी कळवली आहे. नवीन ओखपत्र देण्याची जबाबदारी मुंबई येथील अतिशय कंपनी लि. यांच्याकडे देण्यात आलेली आहे. 
 

एक दृष्टिक्षेप... 
0 नविन ओळखपत्र..16 ऐवजी 10 अंकी 
0 नव्या ओळखपत्रावर दोन्ही क्रमांक येणार 
0 राज्यात 93.46 लाख ओळखपत्र तातडीने छापणार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT