government change the decision about irrigation of well and this decision benefits to most of people and farmers also 
पश्चिम महाराष्ट्र

आता शेतकऱ्यांच्या उत्पादनात पडणार भर; शासनाचा नवा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

लेंगरे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा पाचवरुन वीसपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. कडेगाव खानापूर भागात टेंभुचे पाणी फिरले आहे. मात्र या योजनेतून तलाव, ओढा पात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणी साठविण्याची समस्या शेतकऱ्यांना भेडासवत होती.

शासनाने रोजगार हमीतुन केवळ पाच विहीरीना मंजुर दिली जात होती. यामध्ये गावपुढारी, नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते यांची वर्णी लागत होती. मात्र विहीरीची संख्या वाढविण्यास मजुंरी दिल्याने सामान्य लोकांची वर्णी लागेल अशी आशा पल्लवित झाल्या आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी पाच सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी शासनाकडून घालून देण्यात आलेली होती. भागात टेंभुचे पाणी आल्यामुळे पाणी साठविण्यासाठी शेततळ्याचा वापर केला जात होता.

रोजगार हमीतून देण्यात येणारी संख्या कमी होती. मात्र विहिरींच्या कामांची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन विहिरी लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होणार असल्याने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आहेत.
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शस्त्रसंधीसाठी अटी! होर्मुझवर इराणसह ओमानही आकारणार टोल; भारताकडूनही वसुली?

Chhatrapati Sambhajinagar: डिजिटल रुपया काळाची गरज; रोख व्यवहारांना पर्याय; सुरक्षित, जलद, पारदर्शक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

Latest Marathi News Live Update: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार मोहसिना किडवई यांचे निधन

Beed News: बीडकरांची तहान भागणार कशी?; ३४ कोटींच्या थकीत बिलामुळे नागरिकांचा घसा कोरडाच; अमृत योजनेला ३४ कोटींचा शॉक

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

SCROLL FOR NEXT