government change the decision about irrigation of well and this decision benefits to most of people and farmers also
government change the decision about irrigation of well and this decision benefits to most of people and farmers also 
पश्चिम महाराष्ट्र

आता शेतकऱ्यांच्या उत्पादनात पडणार भर; शासनाचा नवा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

लेंगरे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा पाचवरुन वीसपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. कडेगाव खानापूर भागात टेंभुचे पाणी फिरले आहे. मात्र या योजनेतून तलाव, ओढा पात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणी साठविण्याची समस्या शेतकऱ्यांना भेडासवत होती.

शासनाने रोजगार हमीतुन केवळ पाच विहीरीना मंजुर दिली जात होती. यामध्ये गावपुढारी, नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते यांची वर्णी लागत होती. मात्र विहीरीची संख्या वाढविण्यास मजुंरी दिल्याने सामान्य लोकांची वर्णी लागेल अशी आशा पल्लवित झाल्या आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी पाच सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी शासनाकडून घालून देण्यात आलेली होती. भागात टेंभुचे पाणी आल्यामुळे पाणी साठविण्यासाठी शेततळ्याचा वापर केला जात होता.

रोजगार हमीतून देण्यात येणारी संख्या कमी होती. मात्र विहिरींच्या कामांची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन विहिरी लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होणार असल्याने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आहेत.
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT