The government should not wait for the documents 
पश्चिम महाराष्ट्र

नुकसान भरपाईसाठी कागदपत्रे जमवण्याची वाट सरकारने पाहू नये

अजित झळके

सांगली : राज्यात झालेल्या प्रचंड पावसाने आणि वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने सुरु करावी. त्यासाठी कागदपत्रे जमवण्याची वाट सरकारने पाहू नये. खावटी अनुदान वाटप करावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी खचून गेले आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले. त्यांना कागद न मागता खावटी अनुदान तातडीने द्यावे. एकरी मदत व घराच्या नुकसानीसाठी 40 हजारांची तातडीची मदत करा. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी बोजा पडतो, हे लक्षात घेऊन अशा संकटांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखाव्यात. समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावा. ओढ्या काठावरील अतिक्रमणे तातडीने काढावीत. 

ओढ्यांना मोकळे करावे. त्यांची खोली व रुंदी वाढवण्याचे काम आणीबाणीच्या पातळीवर करावे. समुद्र सपाटीजवळच्या खारेपाट क्षेत्रात समुद्राचे पाणी आज येऊन निचरा होण्यासाठी बंधारे व उघड्या गटारी मोडल्याने अतिवृष्टीने पाणी नुकसान करते आहे. त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर डॉ. पाटणकर यांच्यासह जयंत निकम, संतोष गोटल, चैतन्य दळवी यांच्या सह्या आहेत.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT