grape growers waiting for Traders; Sales will pick up speed next month 
पश्चिम महाराष्ट्र

द्राक्ष बागायतदारांना प्रतीक्षा व्यापाऱ्यांची;  विक्रीला पुढील महिन्यात येणार गती

विष्णू मोहिते

सांगली ः जिल्ह्यात अद्याप द्राक्ष हंगाम गतीने सुरू झालेला नाही. सर्वसाधारणपणे 5 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात हंगामास गती येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही व्यापाऱ्यांची प्रतीक्षा आहे.

निर्यातक्षम द्राक्षाची उचलही कमीच आहे. सध्या क्वचितच आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री सुरू झाली आहे. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल होत आहेत. त्यामुळे हंगामाला 5 फेब्रुवारीपासूनच गती येण्यास कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अवकाळी व प्रतिकूल वातावरणाचा दुष्परिणाम निर्यातक्षम मालावर होत असल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील काही भागांत आगाप छाटणी केलेल्या द्राक्षाची विक्री झाली होती. त्यानंतर फारशी खरेदी सुरू झाली नाही. द्राक्ष पिकास पोषक वातावरण असल्याने द्राक्षाची गोडी आणि वाढ चांगली होण्यास मदत होऊ लागली आहे. वास्तविक पाहता दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत विक्रीस येतात.

जानेवारी महिन्याच्या मध्यावर देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतात. हळूहळू हंगामास गती येते. यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे विघ्न आले होते. त्यामुळे एकाच वेळी फळछाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्षाची काढणी सुरू होण्याची शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तुरळक ठिकाणी द्राक्ष विक्री सुरू झाली आहे. परंतु जानेवारी महिन्याचा मध्य झाला तरी, व्यापारी दाखल झाले नाहीत.

काही ठिकाणी व्यापारी दाखल झाले असले, तरी द्राक्षाची गोडी नसल्याने काढणीला सुरवात केली नाही. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम फेब्रुवारीच्या सुरवातीपासून सुरू होईल, आणि फेब्रुवारीच्या मध्यावर गती येईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. 

निसर्गाशी दोन हात 
धुके, ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस अशा अवकाळी व प्रतिकूल वातावरणाचा दुष्परिणाम निर्यातक्षम द्राक्षांवर होत आहे. द्राक्षांवर भुरी, घडकुज, दावण्या आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊन निर्यातीला तडाखा बसू नये, यासाठी शेतकरी दिवसाकाठी दोनदा औषध फवारण्या करीत आहेत. नुकसान होण्याच्या शक्‍यतेने सर्व जण हवालदिल झाले आहेत. मात्र, द्राक्ष उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तींविरोधात दोन हात करत अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी अद्यापही धडपडत आहेत. 

हंगाम उशिरा सुरू होईल.
यंदा द्राक्षाच्या हंगामाला प्रारंभापासून फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करून बागा उत्तमरीत्या जोपासल्या आहेत. एकाच वेळी छाटणी झाल्याने हंगाम उशिरा सुरू होईल. 
- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत सभामंडप कोसळला, ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण दबल्याची शक्यता, बचावकार्य सुरु

इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेची कुणावर नजर? 'त्या' देशाचं नाव घेत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, पुन्हा तणाव वाढणार!

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

Latest Marathi Live Updates: न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

SCROLL FOR NEXT