पश्चिम महाराष्ट्र

फळबागांची होरपळ

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - जिल्ह्यात यंदा पाऊस अतिशय कमी पडला आहे. त्याचा फटका आता एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या फळबागा आता पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याचे चित्र आहे.

फळबागांकडे बहुवार्षिक पीक म्हणून पाहिले जाते. त्यांची जोपासना करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. लिंबू, आंबा, डाळिंब, द्राक्षे यांसारख्या फळबागांना अतिशय गांभीर्याने शेतकऱ्याने सांभाळलेले असते. फळबागांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे. अनेक वेळा वार्षिक चांगले उत्पादन देण्याचे कामही या फळबागा करतात. मात्र, यंदाच्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे या फळबागा संकटात सापडल्या आहेत. उत्तर सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, बार्शी या तालुक्‍यातील फळबागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण झाली असतानाही प्रशासन मात्र त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. यंदा पाऊस कमी झाल्याने शेतीमधून काहीच उत्पन्नही मिळालेले नाही. एखाद्या शेतकऱ्याने उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चांगला भावही न मिळाल्याने ते मातीमोल किमतीने विकावे लागले आहे. या सगळ्या आर्थिक दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. फळबागा वाचविण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड सुरू आहे.  

...अन् शरद पवारांच्या मदतीची आठवण
मागील काही वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातही असाच 
भीषण दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामुळे फळबागा जळू 
लागल्या होत्या. तत्कालिन कृषिमंत्री शरद पवार यांनी या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली होती. मात्र, सध्याच्या सरकारचे या गोष्टीकडे लक्षही नाही. त्यामुळे जिल्ह्यात पडलेल्या या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना पवार यांची आठवण आल्याशिवाय राहात नसल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT