पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी जनता दल (सेक्युलर)चे आंदोलन

सकाळवृत्तसेवा

शिरोली पुलाची - शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, या मागणीसाठी जनता दल (सेक्युलर) तर्फे शहराच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली.

आंदोलकांच्या मागण्या

  • साठ वर्षावरील सर्व शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, वनवासी तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मच्छीमारी करणाऱ्या सर्वांना दरमहा पाच हजार रूपये पेन्शन मिळावी.
  • संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, विधवा/परित्यक्ता, भूमिहीन शेतमजूरांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांमधून दोन हजार रूपये पेन्शन मिळावी. 
  • डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी.

सकाळी अकरापासूनच आंदोलक तावडे हॉटेल येथे जमा झाले. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शन करत, पेन्शन आमच्या हक्काची- नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतय देत नाही - घेतल्या शिवाय रहात नाही अशा घोषणांनी परीसर दुमदुमून गेला. दुपारी एक वाजता आंदोलक घोषणा देत, रस्त्यावर उतरले. त्यांनी कोल्हापूर शहराच्या प्रवेश दारातच ठिया मांडला व वाहतूक रोखली. 

अॅड श्रीपतराव शिंदे म्हणाले, पेन्शन नाकारणाऱ्यांचा समाचार या निवडणूकीत घेऊच. शेतकऱ्यांच्या मागण्या जो पक्ष पूर्ण करेल किंवा पूर्ण झाली नाही तर राजीनामा द्या असे सांगता येणाऱ्या पक्षालाच आम्ही निवडणूकीत पाठिंबा देणार आहोत. स्वबळावर निवडणूक जिंकता येईल का हा चर्चेचा मुद्दा असला तरी कोणाला तरी विजयी किंवा पराभूत करण्याची ताकद आमच्यात नक्कीच आहे. 

उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, सिक्कीम, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांना पेन्शन मिळत असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पेन्शन का दिली जात नाही

- प्रताप होगाडे 

शिवाजी परुळेकर म्हणाले, ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यांच्यावर खटले दाखल करा.
यावेळी विठ्ठल खोराटे, अरुण सोनाळकर, बाळेश नाईक, वसंतराव पाटील, मधुकर पाटील, संभाजी पाटील, विठ्ठल मुसळे, शरद पाडळकर, अनिल देवेकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT