वेदगंगा नदीचे पाणी पातळी खालावली आहे. sakal
पश्चिम महाराष्ट्र

जत्राट : वेदगंगेची पाणी पातळी खालावली

पिकांना पाणी देण्यात अडचणी शेतकरयांची कसरत

विकास पाटील

जत्राट: गेल्या चार दिवसापासून येथील वेदगंगा नदीचे पाणी पातळी खालावली आहे. काळम्मावाडी धरणातून वेदगंगा नदीला पाणी सोडले जाते. मात्र ते अद्याप न आल्याने पाणीपातळीत घट झाली आहे. सध्या उसासह विविध पिकांना पाणी देण्यात शेतकरी व्यक्त आहेत. मात्र पाणी पातळी घटल्याने अडचणी येत आहेत.

महिनाभरापासून वेदगंगा नदीचे पात्र दुथडी वाहत होते. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासह पिकांची पाणी समस्या मिटली होती. नदीकाठावरील काही गावांनी नळपाणी योजना राबविली आहे. सध्या पाणी कमी झाल्याने या योजना धिम्या गतीने सुरु आहेत. महिनाभर सातत्याने पाणी उपसा झाल्यामुळे पाणी पातळी घटली आहे. सध्या नदीत काही प्रमाणात पाणी आहे. मात्र जनावरांना नदीत पाणी पाजण्यासाठी घेऊन गेल्यास गाळ वर येत असल्याने सर्वच पाणी गढूळ होत आहे. तसेच नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे पाणी गढूळ होत आहे. नागरिकांनी नदीपात्राची स्वच्छता ठेवल्यास सर्वांनाच स्वच्छ पाणी मिळणार आहे. सध्या ग्रामीण भागात जत्रा, यात्रांचा हंगाम सुरु झाला आहे. अंथरुण व कपडे धुण्यासाठी महिला नदीला जात आहेत. मात्र पाणी कमी झाल्यामुळे त्यांना कसरत करावी लागत आहे. तर काहीजण कूपनलिका व विहिरीवर अंथरूण व कपडे धुण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे. गैरसोय दूर करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

वेदगंगा नदीतील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. नदीला पाणी आल्यास पिकांना पाणी देणे सोयीस्कर होणार आहे.

-लक्ष्मण खोत,शेतकरी, जत्राट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT