कळंबा तलावाचे मंगळवारी घेतलेले छायाचित्र.
कळंबा तलावाचे मंगळवारी घेतलेले छायाचित्र. 
पश्चिम महाराष्ट्र

‘कळंबा’ची पाणी पातळी १६ फुटांवर

सकाळवृत्तसेवा

गतवर्षीपेक्षा ३ फुटांनी कमी; गावाला दिवसाआड पाणी पुरवठा

कळंबा - उन्हाळ्याची सुरवात होत असतानाच कळंबा तलावातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होत चालला आहे. तलावाची पाणी पातळी फेब्रुवारीतच १६ फुटांपर्यंत गेली आहे. गतवर्षी फेब्रुवारीत ती १९ फुटांवर होती. त्यामुळे यंदा कळंबा गावालाही ग्रामपंचायतीने दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. आत्ताच ही वेळ आल्याने काही दिवसांनी कोल्हापूर शहरालाही याची झळ बसणार आहे. 

उन्हाळ्याची सुरवात होताच कळंबा तलावाच्या पूर्व, पश्‍चिम, दक्षिण बाजूच्या क्षेत्रातील पाणी साठ्यामध्ये प्रचंड प्रमाणात घट होत आहे. गेल्या वर्षी तलाव पूर्णपणे आटला होता. त्यावेळी तलावातील गाळही काढला होता. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तलाव ओसंडून वाहिला. सध्या असलेले पाणी कळंबा गावासह शहरातील कळंबा फिल्टर हाऊस येथे उपसा करून शहरातील काही भागात पुरवले जाते. सध्या कळंबा गावात एक हजार नळ कनेक्‍शन आहेत. कळंबा गावाला रोज १८ लाख लिटर पाण्याची 
गरज असते. 

दरम्यान, पाणीसाठा कमी होत असल्याचा विचार करून महापालिकेने कळंबा ग्रामपंचायतीला एक दिवस आड तलावातून पाणी उपसा करावा, अशी विनंती केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीनेही दिवसाआड पाणी पुरवण्यास सुरवात केली आहे. 

कळंबा तलावातील पाणीसाठा कमी होत असल्याने महापालिकेने एक दिवसआड पाणीपुरवठा करावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यवाही करत आहे. 
- दीपक तिवले, ग्रामपंचायत सदस्य, कळंबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: फिलिप सॉल्टची तुफानी फटकेबाजी, दिल्लीविरुद्ध ठोकलं आक्रमक अर्धशतक

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT