कऱ्हाड - कचऱ्यामुळे शनिवार पेठेत तुंबलेले गटार.
कऱ्हाड - कचऱ्यामुळे शनिवार पेठेत तुंबलेले गटार. 
पश्चिम महाराष्ट्र

व्यापाऱ्यांचा कचरा ठरतोय स्वच्छतेत बाधा

सचिन शिंदे

कऱ्हाड - स्वच्छ सर्व्हेक्‍शनांतर्गत शहरातील कचरा कोंडाळी गायब झाली. तेथे स्वच्छताही आली. रांगोळ्या रेखाटल्या जावू लागल्या आहेत.

पालिकेतर्फे घरोघरी बकेट वाटपही केले जाणार आहे. शहरात स्वच्छतेसाठी अनेक संस्था, लोक पुढे येत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांकडून सर्रास टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर अद्याप काहीही उपाय शोधला गेलेला दिसत नाही. त्या कचऱ्यामुळे स्वच्छ असलेल्या नागरी वसाहती अस्वच्छ होत असून, त्या कचऱ्यामुळे नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या शोरूम किंवा मोठ्या व्यापाऱ्यांच्या येणाऱ्या मोठाल्या पार्सलमधून येणारे थर्माकॉल, प्लॅस्टिक कागद व पुठ्ठ्याची विल्हेवाट लावण्याबाबत काहीच जागरूकता झालेली नाही. अनेकदा हे सारे साहित्य व्यापारी रात्री उशिरा एखाद्या कोपऱ्यात टाकतात किंवा ते सरळ गटारांत टाकले जाते. 

शहरात स्वच्छ सर्व्हेक्‍शनांतर्गत चांगले काम झाले. सलग तीन दिवस पाहणी झाली. त्यासाठी पालिकेने जय्यत तयारीही केली होती. त्यानिमित्ताने पालिकेत सारेच एकत्र आल्याचेही पाहावयास मिळाले. सर्व्हेक्‍शनांतर्गत शहरातील बहुतांशी ठिकाणची कोंडाळी काढून टाकण्यात आली. तेथे फलक लावून कायदेशीर कारवाईचा इशारा पालिकेने दिला. अनेक भागात घंटागाडी सुरू करण्यात आली. शहरात घरटी बकेट वाटण्यात येणार आहेत. मात्र, मोठी कोंडाळी गायब करून पालिकेने त्या ठिकाणी सुरू केलेल्या घंटागाडीमुळे कचरा देतानाच वेगवेगळ्या स्वरूपात देण्याचे आवाहन नागरिकांना पालिकेने केले आहे. अनेक भागात अद्याप पालिकेने बकेट वाटलेली नाहीत. त्यामुळे तेथील कचरा तसा स्वीकारला जातो आहे. अनेक ठिकाणी कोंडाळी काढून टाकल्यामुळे दोन वेळा घंटागाडी सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे.

नागरिकांना सवय लागेपर्यंत पालिका त्याचे टाइमटेबल सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला नागरिकांनाही चांगली साथ दिली आहे. नागरिकांनी अनेक ठिकाणी कचरा टाकण्याचे बंद केले आहे. कोंडाळी उचलून नेल्याने सतत घाणीच्या साम्राज्यात असलेला शहरातील अनेक परिसर स्वच्छ दिसू लागला आहे. त्यामध्ये पालिका व नागरिक यांच्या समन्वयातून चांगले यश आले आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या कचऱ्याचा प्रश्न अद्यापही शहरातील स्वच्छतेला बाधा ठरताना दिसतो आहे. त्याकडे पालिका व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. 

शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठी शोरूम आहेत. अनेक मोठे व्यापारी आहेत. त्यांचा माल येताना मोठी पार्सल येतात. ती पार्सल पॅक करण्यासाठी कंपन्या 

व्यापाऱ्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग योग्य ती काळजी घेत आहे. त्यांच्यासाठी दोन वेळा व रात्री एकदा ट्रॅक्‍टर फिरवण्यात येणार आहे. त्यातूनही तो कचरा त्या गाडीत न टाकणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले जाईल, त्यासाठीही पालिका तत्पर आहे.
- प्रियांका यादव, आरोग्य सभापती, कऱ्हाड पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT