पश्चिम महाराष्ट्र

कवठेपिरानमध्ये मानेच "हिंदकेसरी'

सकाळवृत्तसेवा

सांगली ः हिंदकेसरी दिवंगत मारुती माने यांच्या कवठेपिरान (ता. मिरज) गावात सत्ता कायम राखण्यात त्यांचे पुतणे भीमराव माने यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. त्यांनी सतरापैकी 14 जागा मिळवत गावातील सत्ता पुन्हा हस्तगत केली आहे. त्यांच्याच गटातील जुने सहकारी श्रीकांत वडगावे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील 152 गावांची निवडणूक झाली. पैकी नऊ गावे बिनविरोध झाली. 143 गावांसाठी निवडणूक लागली होती. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. मिरज तालुक्‍यातील मतमोजणी मिरज येथील वैरण बाजार परिसरात सुरु झाली. तेथे सकाळी आठपासून लोक जमले होते. कवठेपिरान हे मिरज तालुक्‍यातील मोठ गाव आहे.

हिंदकेसरी मारुती माने यांचे गाव म्हणून त्याचा महाराष्ट्रभर दबदबा आहे. या गावात सत्ता कुणाची येणार, याकडे लक्ष लागले होते. भीमराव माने यांना आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे काहीशी चुरस होती, मात्र राजकीय आखाड्यात कसलेल्या मल्लासारखी कुस्ती करत भीमराव माने यांनी गावातील सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. अर्थात, या गावात भीमराव माने यांच्या विरोधात पहिल्यांदा एवढा राजकीय वणवा पेटला होता. त्या वादळात विरोधकांनी तीन जागा जिंकल्या, हेही नसे थोडके. त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्‍वास काहीसा बळावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT