Khanapur Constituency Minister Anil Babar Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

अनिल बाबरांचे मंत्रीपद का हुकले...?

सकाळ वृत्तसेवा

विटा (सांगली) :  खानापूर मतदार संघातून सलग दोनवेळा आमदार झालेल्या अनिल बाबर यांना मंत्रिमंडळात शंभर टक्के संधी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. ती आता फोल ठरली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असती तर अनिलभाऊ आज मंत्री असते, अशी कुजबुज त्यांच्या गोटात सुरू झाली आहेसन 2014 मध्ये राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनिल बाबर यांनी सांगलीच्या गडात पहिल्यांदा शिवसेनेचे खाते खोलले. ते जिल्ह्यातील पहिले शिवसैनिक आमदार झाले.

शिवसेनेलाही अपेक्षा नसताना हे घडले. त्यावेळी भाजप, शिवसेना स्वतंत्र लढली होती आणि बाबर यांनी शिवसेनेत जावून चूक केली, असा सूर उमटला होता. अनिलभाऊंनी शिवसेनेत जावे, हा निर्णय त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी घेतला होता. त्यामुळे सुहास यांच्यावर त्यावेळी प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली होती, पण बाबर यांनी वादळात दिवा लावला. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजपच्या उमेदवारांना अस्मान दाखवत ते आमदार झाले. राज्यात भाजप-शिवसेनेत पाच वर्षे तणावाचीच राहिली. या काळात सेनेने भाजपचा पाठिंबा काढू नये, यासाठी उघडपणे भूमिका घेणाऱ्यांमध्येही बाबर एक होते


हेही वाचा -....पाकिस्तान अभी बाकी है 

भाजपशी जिव्हाळ्याचे संबंध

सन 2019 ला त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेकडून बाजी मारली आणि ते मंत्री होणार, असेच चित्र निर्माण झाले. भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर बाबर यांची शपथ निश्‍चित, असेच मानले गेले. कारण, बाबर शिवसेनेचे असले तरी त्यांचे भाजपशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर त्यांच्यावर मोठी मेहरनजर राहिली. त्यामुळे भाजप-शिवसेनेची सत्ता आली असती तर पश्‍चिम महाराष्ट्रात सांगलीला प्राधान्याने शिवसेनेला पद द्यावे लागले असते. बाबर मंत्री झाले असते, असे त्यांचे कार्यकर्ते आता कुजबूज करू लागले आहेत

हेही वाचा - संभाजी भिडे म्हणतात... गांधीबाधा हा देशाला झालेला रोग 

कुणी कान फुंकले
अनिल बाबर यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी काहीही केले नाही, त्यामुळे त्यांना मंत्री का करावे, असा सवाल शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता, अशीही माहिती समोर येत आहे. "मातोश्री'वर कान फुंकले गेल्याने बाबर यांचा विचार झाला नाही का, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बाबर यांनी आपला मतदार संघ सांभाळला, हे वास्तव आहे, मात्र त्यांच्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा उपाध्यक्ष होता आणि खानापूर पंचायत समिती सेनेच्या ताब्यात होती, हे विसरलात का? असाही सवाल बाबरप्रेमींकडून आता केला जात आहे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: तब्बल ७ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी ठरणार अखेरची

Pandharpur Municipal Elections : 'दोन समाजात तेढ निर्माण करुन भालकेंनी निवडणूक जिंकली'; भाजप आमदार आवताडेंचा गंभीर आरोप

बापरे! किशोरी शहाणे यांच्या कारला धडक, अभिनेत्रीचा संताप, Viral video

Saving Scheme : बायकोसोबत या सरकारी योजनेत करा गुंतवणूक! वर्षाला मिळेल तब्बल 1,11,000 रुपये व्याज; पैसे पूर्ण सुरक्षित

Breaking News ZP Election : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT