करंबळी : नव्याने सुरवात केलेल्या वाचन विहार पुस्तक भिशीची सोडत काढताना डॉ. राजन गवस. शेजारी एस. आर. पाटील, गंगूबाई पन्हाळकर, मनीषा सुतार, शशिकला पाटील, मधुकर जांभळे आदी.
करंबळी : नव्याने सुरवात केलेल्या वाचन विहार पुस्तक भिशीची सोडत काढताना डॉ. राजन गवस. शेजारी एस. आर. पाटील, गंगूबाई पन्हाळकर, मनीषा सुतार, शशिकला पाटील, मधुकर जांभळे आदी. 
पश्चिम महाराष्ट्र

करंबळीत सुरू झाली पुस्तकांची अनोखी भिशी

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज - पैशाच्या भिशीची साऱ्यांनाच कल्पना असेल. शहरातून आता गावोगावीही अशा भिशींचे पेव फुटले आहे; पण पुस्तकांची भिशी ही कल्पनाच निराळी. नेसरीनंतर आता करंबळी (ता. गडहिंग्लज) येथेही पुस्तकांची भिशी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे २२ महिलांनी एकत्र येत ही भिशी सुरू केली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे वाचन चळवळीला बळ मिळणार आहे, हे मात्र नक्की.

उपक्रमशील शिक्षिका शशिकला पाटील यांच्या पुढाकारातून नेसरी येथे चार महिन्यांपूर्वी पुस्तक भिशीची सुरवात झाली. त्यापासून आदर्श घेत करंबळीतही वाचन विहार पुस्तक भिशीची सुरवात करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते या पुस्तक भिशीची पहिली सोडत काढण्यात आली. स्वप्नाली सुतार या सोडतीच्या भाग्यवान विजेत्या ठरल्या.

महिलांना आरोग्याचे महत्त्व पटवून देताना डॉ. गवस यांनी पुस्तकासारखा डॉक्‍टर नाही, पुस्तके माणसाला जगायला शिकवत असल्याचे सांगितले. डॉ. गवस यांनी आपल्याकडील एक हजार पुस्तके भिशीसाठी देत असल्याचे जाहीर केले.
सुरेखा मोटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गंगुबाई पन्हाळकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. शशिकला पाटील, माजी प्राचार्य एस. आर. पाटील, सरिता कांबळे, सानिका पाटील यांची भाषणे झाली. पोस्टल ॲसिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल धनश्री साबळे यांचा सत्कार झाला. यावेळी एकनाथ पाटील, मधुकर जांभळे, शिवाजी पन्हाळकर, पंडित सुतार, सुखदेव साबळे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, छाया येसादे, मंगल माळी, अनुराधा पोवार, गंगुबाई पन्हाळकर, सुरेखा मोटे, उमा सुतार, सरिता कांबळे, मनीषा सुतार, वृषाली साबळे, जयश्री जांभळे, स्वप्नाली सुतार, श्रीप्रिया पाटील, शेवंता माळी, कविता जाधव, सुमन शिंदे, वंदना सलपे, अर्चना बाबर, धनश्री साबळे, निशिगंधा बोटे, सौ. साळोखे, सुप्रिया पाटील, भाग्यश्री जाधव या पुस्तक भिशीच्या सदस्या आहेत.

अशी चालणार भिशी...
पुस्तक भिशीतील सहभागी प्रत्येक महिलेने दरमहा १०० रुपये जमा करायचे. जमलेल्या सर्व रकमेची पुस्तके खरेदी करायची. दरमहा निघणाऱ्या सोडतीतील भाग्यवान विजेत्या महिलेला ही पुस्तके द्यायची. संबंधित महिलेने अन्य महिलांना वाचण्यासाठी पुस्तके द्यायची. दुसऱ्या महिन्याच्या सोडत कार्यक्रमात प्रत्येक महिलेने आपण वाचलेल्या पुस्तकावर पाच मिनिटे आपले विचार मांडायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT