पश्चिम महाराष्ट्र

हा फक्त काँग्रेसचाच आक्रोश - चंद्रकांत पाटील

निखील पंडितराव

कोल्हापूर -  घोटाळे, भ्रष्टाचार, काळा पैसा, महागाई यामुळे देशाला दिवाळीखोरीत लोटण्याचे काम साठ वर्षे काँग्रेसने केले. याला कंटाळूनच देशातील व राज्यातील जनतेने भाजपला सत्ता दिली. देशात व राज्यात ज्या पद्धतीने विकासाचे नवे पर्व सुरू आहे, ते पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकून त्यांच्यावर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आक्रोश आणि पश्‍चात्ताप करण्याची वेळ आली आहे. स्वतःचा आक्रोश म्हणजे जनतेचा आक्रोश, असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. जनतेने केवळ देश व राज्य चालविण्यासाठी भाजपला बहुमत दिले नसून गरिबांचा तो जनादेश आहे. नोटाबंदीमागे गोरगरीब ज्या ठामपणे उभे आहेत, त्यावरून निर्णयाच्या यशाची कल्पना येते. विरोधकांकडून आता सगळे मुद्देच हिसकावले गेल्याने ते सैरभैर झाले आहेत. नोटाबंदीनंतर पैशांची टंचाई असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत १० हजारपैकी भाजपने ८००० जागा जिंकल्या, तर उत्तर प्रदेशात सत्ता स्थापना केली.’’

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विकासाचे पर्वच आणले आहे. शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्याचा अर्थसंकल्प हा शेतीपूरक आहे. सौरऊर्जेसह कृषी पंपांना पुरेशी वीज, आठवडा बाजार, बाजार समितीत शेतकऱ्यास मताचा अधिकार, सोयाबीन, तूर खरेदी, जलयुक्त शिवार योजनेतून गावे दुष्काळमुक्त झाली.

कृषी विकासाचा दर वाढत जाऊन तो साडेबारा टक्‍क्‍यांवर गेला. शेतीतील गुंतवणूक तीस टक्‍क्‍यांहून अधिक झाली आहे. सत्तर लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. काँग्रेसच्या काळात श्रीमंत आणि राजकारणी शेतकरीच कर्जमाफीचे लाभार्थी होते. संकुचित मनाच्या काँग्रेसला हा विकास दिसणार नाही; पण गोरगरीब जनतेला विकास झाल्याचे चांगले माहीत असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘तीन वर्षांत आम्ही जे करून दाखविले त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. देशातील लाखो लोकांना रोजगार देण्यासाठी तळागाळातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर भांडवल पुरवून प्रचंड रोजगार निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे. यातून अडीच वर्षांत १.६८ कोटी लघुउद्योजकांनी साडेतीन लाख कोटी रुपये कर्ज घेऊन साडेपाच कोटी रोजगार निर्मितीमध्ये हातभार लावला आहे. महाराष्ट्रातील तब्बल ३५.३५ लाख लोकांनी तब्बल ३४ हजार कोटी कर्ज घेऊन उद्योग क्षेत्रात भरभराट आणली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Player Heart Attack Video : क्रिकेट खेळताना मैदानावरच खेळाडूला हृदयविकारचा तीव्र झटका; जागीच कोसळून मृत्यू

Property Tax : विरोधामुळे मिळकतकर वाढीचा निर्णय लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव पुढे ढकलला

Pali News : पशुपालकांना मोठा दिलासा! वीज बिलाच्या टेन्शनमधून सुटका; आता 'कृषी' दराने मिळणार वीज

Police Recruitment : मोठी बातमी! पोलिस भरतीला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ; १६३३ जागांसाठी तब्बल १.३९ लाख अर्ज

Latest Marathi News Live Update : सफदरजंग परिसरात एनडीएमसीच्या एका गोदामाला भीषण आग

SCROLL FOR NEXT