पश्चिम महाराष्ट्र

मलेशियातील मराठी तरुणांना ३ महिने शिक्षा

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - एजंटाने फसवणूक केल्यामुळे मलेशियात अनधिकृत प्रवेश केल्याच्या गुन्ह्यातील चार मराठी तरुणांना न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. भारत सरकारने वकील न दिल्यामुळे नातेवाईकांनी दिलेल्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली.

योग्य मुद्दे न्यायालयासमोर आल्यामुळे कमीत कमी शिक्षा झाली. न्यायमूर्तींनी दंडही सुनावला नाही. चारही तरुणांनी तीनपैकी एक महिने शिक्षा भोगली असल्यामुळे आता त्यांना केवळ दोन महिनेच तुरुंगात राहावे लागणार आहे.

दरम्यान, मलेशियातील येथील भारतीय वकिलातीचे हाय कमिशन उद्या (ता. १३) तरुणांना भेटणार आहे. तरुणांनी चांगली वर्तवणूक ठेवली तर त्याची शिक्षा कमी करण्यासाठी भारतीय दूतावासामार्फत विनंती करता येईल. गुरुनाथ इराण्णा कुंभार (वय १९, रा. मु. पो. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन अशोक शिंदे (२०, बेलवंडी, जगदंबा फॅक्‍टरीजवळ, ता. कर्जत, जि. नगर), दीपक लिंबाजी माने (मु. पो. व्हन्नूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि सदानंद धनगर (महाराष्ट्र) अशी या चार तरुणांची नावे आहेत.

नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसविले आहे. त्यांना मलेशियात अटक झाल्याची बातमी सर्वप्रथम ‘सकाळ’ने सर्वांसमोर आणली. त्यानंतर त्याचा पाठपुरावा झाला आणि देशाने असमर्थता दर्शविल्यावर नातेवाईकांकडून न्यायालयात वकील देण्याची प्रक्रियाही तरुणांना आधार  देणाऱ्या ‘टीम’ने केला. शेतकरी कुटुंबातील या तरुणांना मायदेशी आणण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

सांगलीतील पोलिसपुत्र असलेल्या कौस्तुभ सदानंद पवार या एजंटने हॉटेलात नोकरी देतो असे सांगून त्यांना मलेशियात पाठविले. तेथे ‘वर्किंग व्हिसा’ नसल्यामुळे त्यांना अनधिकृत प्रवेश करून मलेशियात काम करीत असल्याच्या कारणावरून अटक केली. गेले २९-३० दिवस ते तुरुंगात होते. त्यांना आज सकाळी साडेनऊ वाजता न्यायालयात हजर केले.

पंधरा-वीस मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने ही तीन महिन्यांची शिक्षा सुनावल्याचे सांगण्यात आले. तसेच कोणत्याही दंडाची आकारणी केलेली नाही. चारही तरुणांना तुरुंगात ठेवले जाणार आहे. उद्या भारतीय वकिलातीचे अधिकारी तरुणांना भेटणार आहेत. तेथे त्यांची विचारपूस करून त्यांना आणखी काय मदत आवश्‍यक आहे, याची ते माहिती घेणार आहे. त्यांची वर्तणूक चांगली असल्यामुळे त्यांना शिक्षेत सूट मिळावी, अशीही विनंती ते करू शकतात. उद्या त्यांची तरुणांबरोबर भेट झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. चारही तरुण केव्हा तुरुंगातून सुटणार यासह इतर सविस्तर माहिती मिळणार आहे.

सरेंडर तरुण दोन-तीन दिवसांत मायदेशी शक्‍य
एजंटाने फसवणूक केल्यामुळे आणि वर्किंग व्हिसा नसल्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील पाच तरुण मलेशियातील वकिलातीत आहे. त्यांना मलेशियातून मायदेशी (भारतात) पाठवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. दोन-तीन दिवसांत हे तरुण मायदेशी पाठविले जातील, असे मलेशियातील भारतीय वकिलातीतील अधिकाऱ्यांनी दिल्लीतील परराष्ट्र सचिवांना कळविले आहे. दोन महिने काम केलेला पगार आणि पासपोर्ट एजंटाने काढून घेतल्यामुळे त्यांना मायदेशी येणे शक्‍य होत नाही. परिणामी कोल्हापूरसह पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हे तरुण सरेंडर झाले होते. त्यांच्या सुटकेसाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून नातेवाईकांनी पाठपुरावा केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT