रुई (ता. हातकणंगले) - येथील पंचगंगा नदी पात्रात छोटी जलपर्णी अशा पद्धतीने वाढली आहे. त्यामुळे पात्र पूर्णपणे खेळाच्या मैदानासारखे दिसत आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा) 
रुई (ता. हातकणंगले) - येथील पंचगंगा नदी पात्रात छोटी जलपर्णी अशा पद्धतीने वाढली आहे. त्यामुळे पात्र पूर्णपणे खेळाच्या मैदानासारखे दिसत आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)  
पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीचा विळखा 

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - पंचगंगा नदी पात्रातील दूषित पाण्याची तीव्रता ठळकपणे पुढे आली आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात या पात्राला जलपर्णीचा विळखा बसण्याची सूचना आतापासूनच मिळू लागली आहे. रुई (ता. हातकणंगले) येथील नदी पात्रात एक इंचही जागा जलपर्णीविना रिकामी नाही. त्यामुळे पंचगंगा नदी पात्राची अवस्था खेळपट्टीवरील हिरवळीप्रमाणे दिसू लागली आहे. 

दरवर्षी जानेवारी ते मे या महिन्यात पंचगंगा नदी पात्राला प्रदूषणाचा विळखा पडतो. पाणी वाहते राहिले तर प्रदूषणाची तीव्रता कमी प्रमाणात जाणवते. मात्र ठिकठिकाणच्या बंधाऱ्यावर पाणी आडवून ठेवल्यास प्रदूषणाची तीव्रता अधिक वाढते. बंधाऱ्याला फळ्या घातल्याने पाणी अधिक दूषित होते, हे वास्तव असले तरी फळ्या काढल्यानंतर पाणी पुढे गेल्यावर त्या परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याचबरोबर या वर्षी धरणातील पाणी कमी प्रमाणात सोडण्याचे नियोजनामुळे वेळोवेळी येणारे पाणी ठिकठिकाणी अडविले जात आहे. 

नदी पात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात मैलाचे प्रमाण असल्यास जलपर्णी अधिक गतीने वाढते असे यापूर्वीच आढळून आले आहे. कोल्हापूरपासून रुई बंधाऱ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मैलायुक्त पाणी नदीत मिसळल्यामुळेच सध्या पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. सध्या या जलपर्णीची वाढ गतीने होऊ लागली आहे. एक दोन इंचाच्या आकाराचेच पानाची वाढ येत्या काही दिवसात होणार आहे, मात्र तत्पूर्वीच पात्र खेळाच्या मैदानावरील हिरवळीसारखे बनले आहे. 

सध्या नदी पात्राच्या या स्थितीला पाणी प्रवाहित ठेवणे हा एकमेव उपाय आहे. मात्र धरणातील साठवणूक क्षमतेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे या वर्षी उन्हाळ्यात पंचगंगा नदी प्रवाहित होण्याची धुसर शक्‍यता आहे. परिणामी हे पाणी या वर्षी अधिकच दूषित होणार असल्याचे आतापासूनच दिसू लागले आहे. 

पाणीटंचाईचा धोका 
नदी पात्रात दूषित पाणी आल्यानंतर अनेक नळपाणी योजना बंद ठेवल्या जातात. या वर्षी या योजना दीर्घ कालावधीसाठी बंद राहणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT