पश्चिम महाराष्ट्र

मलेशियात अडकलेल्या तरुणांचा आज फैसला

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - एजंटाने फसवणूक केल्याने मलेशियातील तुरुंगात अडकलेल्या चार मराठी तरुणांना आज (ता. १२) न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांना सोडविण्यासाठी नातेवाईकांकडून दिलेले ॲड. जसओन वीई हे त्यांची बाजू मांडतील. सकाळी नऊला सुनावणी सुरू होणार असून, प्रत्येक तरुणाची स्वतंत्र सुनावणी होईल. अनधिकृतपणे मलेशियात प्रवेश केल्याचा गुन्हा चौघांवरही दाखल केला असल्याचे वकिलांनी सांगितले.

न्यायालयात जो निर्णय होईल, त्यावर भारतीय वकिलातीतर्फे पुढील पावले टाकली जातील.
- ज्ञानेश्‍वर मुळे,  परराष्ट्र सचिव

दरम्यान, फसवणुकीमुळे मलेशियात अटक केलेले चार आणि सरेंडर झालेले पाच अशा नऊ तरुणांना महाराष्ट्रात आणण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. परराष्ट्र स्थायी समितीचे ते एक सदस्य आहेत. त्यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत हा विषय पोचविला आहे. ते स्वतः परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्याशी संपर्कात आहेत. सर्व तरुणांना आवश्‍यक ती सर्व मदत करू, मी स्वतः या तरुणांना सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच, ‘सकाळ’ने हा विषय पुढे आणल्याबाबत मला सांगितले असून, तरुणांना सोडविण्यासाठी स्वतः लक्ष घातले असल्याचेही सचिव मुळे यांच्या चर्चेदरम्यान सांगितल्याचे खासदार संभाजीराजे यांनी  ‘सकाळ’ला सांगितले.

अनधिकृतपणे मलेशियात प्रवेश केल्याचा गुन्हा चारही तरुणांवर ठेवलेला आहे. त्यांची सुनावणी उद्या होईल. भारत सरकारकडून अधिकृत वकील देण्यास असमर्थता दर्शविल्याने तरुणांना सोडविण्यासाठी नातेवाईकांसह टीमने खासगी वकील दिले आहेत. त्यांच्या फीतील काही हिस्सा भारतीय वकिलाती देणार असल्याचे सचिव मुळे यांनी रविवारीच (ता. १०) जाहीर केले आहे. तरीही मूळचे कागलचे; पण सध्या मलेशियात स्थित असलेल्या प्रवीण नाईक यांनी वकिलांची फी अदा केली आहे. आज होणाऱ्या सुनावणीत चारही तरुणांना शिक्षा नको, त्यांना थेट मायदेशी परत पाठवावे, याची जबाबदारी भारतीय वकिलाती घेईल, अशा पद्धतीची बाजू मांडण्याचा प्रयत्न वकिलांकडून होणार आहे. 

भारतीय तरुणांतर्फे उद्या न्यायालयात बाजू मांडणारे ॲड. जसओन वीई यांनी तुरुंगासह न्यायालयातून त्यांची अधिक माहिती घेतली आहे. मलेशियात अनधिकृत प्रवेश केल्याने साधारण सहा दिवस ते सहा महिने कारावास होऊ शकतो. तरीही या तरुणांनी सुमारे २८-२९ दिवस न्यायालयात काढले आहेत. नकळत त्यांच्याकडून ही चूक झालेली आहे.  त्यांना शिक्षा न करता भारतीय वकिलातीकडे सुपूर्द करावे, अशी मागणी उद्या वकील न्यायालयात करतील. त्यानंतर होणाऱ्या निकालावर पुढील दिशा ठरेल.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व तरुणांना सोडविण्यासाठी आवश्‍यक सर्व खर्च देशाकडून करण्याची तयारीही दाखविली आहे. एकूण नऊ जणांना महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांचा दंड आणि विमानाची तिकिटे सरकारकडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही खासदारांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. आजची सुनावणी झाल्यानंतर तुरुंगातील चार तरुणांना सोडण्याचा निर्णय झाल्यास उर्वरित पाच तरुणांनाही तातडीने मायदेशी पाठविण्यासाठी भारतीय दूतावासाबरोबर बोलणे सुरू असल्याचे खासदारांनी सांगितले.

संबंधीत बातम्या..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT