पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - तिरुपती विमानाचे १ नोव्हेंबरला होणार टेक ऑफ

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर तिरुपती विमानसेवा येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे समजते. इंडिगो कंपनीच्या माध्यमातून सध्या उजळाईवाडी विमानतळावर त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे.

दरम्यान, कोल्हापूर-मुंबई या नियमित विमानसेवेचे शुक्‍लकाष्ठ कायम असून, या आठवड्यातील मंगळवार, तसेच बुधवारी तांत्रिक कारणांमुळे विमानसेवा खंडित झाली.

विमानसेवा नियमित सुरू होण्यापेक्षा हे विमान कुणामुळे आले, याचाच श्रेयवाद अनेक दिवसांपासून रंगला आहे. रविवार, मंगळवार आणि बुधवार अशी आठवड्यातून तीनवेळा कोल्हापूर-मुंबई विमानसेवा चालते. एअर डेक्कनमार्फत सेवा चालविली जाते. कोल्हापूर-मुंबई, तसेच मुंबई-कोल्हापूरसाठी प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. ऐनवेळी विमान येणार नसल्याचे मेसेज येऊन धडकत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

या आठवड्यात दोनवेळा विमान न आल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली. नेहमीप्रमाणे तांत्रिक कारण देण्यात आले. सणासुदीच्या दिवसांत सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असताना नेमका याच दिवसांत सेवा खंडित झाल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, कोल्हापूरहून तिरुपतीला तसेच तिरुपतीहून कोल्हापूरला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वेचा आधार आहे. कोल्हापूर-तिरुपती या विमानसेवेला १ नोव्हेंबरपासून मुुहूर्त मिळणार असल्याचे समजते. इंडिगो कंपनी ही सेवा देणार आहे. कोल्हापूर-तिरुपती, तिरुपती-कोल्हापूर आणि नंतर हैदराबाद अशी सेवा असेल. कोल्हापूर-बंगळूरसाठी अन्य एका कंपनीने तयारी दाखविल्याचे समजते.

तांत्रिक कारणामुळे पुढे मूहूर्त ढकलला
कोल्हापूरहून याच महिन्यात तिरुपतीला विमान जाणार होते. काही कारणांमुळे १ नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त ढकलला. इंडिगो कंपनीचे अधिकारी विमानतळावर चाचणी घेत आहेत. या निमित्ताने बोइंग विमान उतरणे तसेच नाइट लॅण्डिंगच्या दृष्टीनेही तयारी सुरू झाली आहे. १५ ऑक्‍टोबरपर्यंत कोल्हापूर -तिरुपती विमानसेवेच्या तांत्रिक बाबी आहेत, त्या पूर्ण होतील. १ नोव्हेंबरपासून विमानाचे टेक ऑफ होईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्ष विमानसेवा सुरू झाल्यानंतरच ती नियमित सुरू राहते की कोल्हापूर-मुंबईसारखी अवस्था होते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT