11 applications for the post of Vice Chancellor of Shivaji University 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ११ जणांचे अर्ज 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथून ११ जणांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठ अधिविभागातील ७ प्राध्यापकांचाही यामध्ये समावेश आहे. काही स्वायत्त विद्यापीठाच्या प्रमुखांनीही यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (ता. २) अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. 

माजी कुलगुरू देवानंद शिंदे यांचा कार्यकाल संपल्याने कुलगुरू पद रिक्त झाले. सध्या प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे पदभार आहे. कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी शोध समितीही नेमली आहे. गुरुवारी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. गेल्या पंधरा दिवसांत या पदासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा येथून ११ जणांनी अर्ज केले असून, यामध्ये प्राचार्य, विद्यापीठ अधिविभागप्रमुख, प्राध्यापक यांचा समावेश आहे. 

विद्यापीठातील अधिविभागातील सात जणांनी अर्ज केल्याचे समजते. यामध्ये भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागातील प्रत्येकी दोन प्राध्यापकांचा समावेश आहे. याशिवाय जैवतंत्रज्ञान विभाग, रसायनशास्त्र विभाग, संख्याशास्त्र विभागातूनही प्राध्यापकांनी अर्ज केले आहेत. काही स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठांमधूनही कुलगुरू पदासाठी काही जण इच्छुक असून, त्यांनीही अर्ज केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलन? पोलिसांनी गुन्हे मागे न घेतल्याने नव्या आंदोलनाचा इशारा

शब्दांनी मनात वादळ उठलं, एका व्हिडिओने देशाला विचार करायला भाग पाडलं, जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान नेमका कोण?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज २८ जुलैपर्यंत तहकूब

Riya Ahir: सतत धमक्या आणि शिवीगाळ, मुंबई पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरचा ऑनलाईन छळ; सायबर सेलकडे धाव

Vitthal Ban Cleanliness Drive : ‘विठ्ठल बन’ डाळींब येथे १६० ग्रामदूतांनी २ तासांत ६ टन कचरा हटवून मंदिर परिसर चकाचक

SCROLL FOR NEXT