कोल्हापूर

पुरामुळं पिकासह जमीन गेली वाहून; 1500 एकरांतील पिकांचा चिखल

पुरामुळे पिकासह जमीन गेली वाहून; पंचनाम्यातील धक्कादायक माहिती

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (heavy rain) पुरासोबत वाहत आलेल्या माती आणि गाळामुळे पिके मातीमोल झाली. जिल्ह्यातील नदीकाठची १५०० एकर शेतातील पिके वाहून गेली आहेत. या शेतात माती आणि चिखल असल्याची माहिती कृषी विभागाच्या पंचनाम्यातून समोर आली आहे. (kolhapur flood) अजूनही पंचनामे सुरू आहेत. अनेक वर्षांमध्ये पुराच्या पाण्याला यंदा खूप गती होती. करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्‍यातील शेकडो एकर जमीन पाण्याच्या प्रवाहासोबत पिकांसह खरडून गेली आहे.

जिल्ह्यात २००५, २०१९ पेक्षाही यंदा आलेल्या पुराच्या पाण्याला प्रचंड गती होती. करवीर, हातकणंगलेसह शिरोळ तालुक्‍यातील शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. करवीर तालुक्‍यातील नदीकाठच्या शेतांत माती व चिखल पसरला आहे. उसासाठी काढलेल्या सऱ्यांची माती पूर्ण वाहून गेली. तर काही ठिकाणी चिखलामुळे या सऱ्या सपाट झाल्या आहेत. पूर ओसरल्यानंतर उसाच्या शेतीला पाणी देण्याचे नियोजन कोलमडणार आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी भाताचे पीक होते ते पूर्ण मातीखाली जाऊन चिखल झाला आहे. ३०० ते ४०० एकर शेती पूर्णपणे वाहून गेली आहे.

"जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याला गती होती. यामुळे नदीतील पाण्यामुळे सुमारे ६०० हेक्‍टर शेतात माती, चिखल झाला असून अनेक ठिकाणची शेती वाहून गेली आहे. सध्या पंचनामे अद्यापही सुरू आहेत. जसजसे पंचनामे होतील तसे आकडा वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही."

- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

"गावती नदीकाठाला उसाचे पीक होते. आतापर्यंत अनेक वेळा पूर आला. कधीही शेती पीक वाहून गेले नाही. यावर्षी मात्र अनेकांची पिके वाहून गेली आहेत. पंचनामे केले जात आहेत."

- बाबासाहेब पाटील, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT