कोल्हापूर

कराडजवळ झालेल्या अपघातात भेंडवडेचे दोघे जागीच ठार

बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता व्यवस्थित न अडवल्याने दुर्दैवी घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

पेठ वडगाव (कोल्हापूर) : कराड तालुक्यातील उंडाळे येथे कराड- रत्नागिरी महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकीखाली कोसळल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. मृत हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील आहेत. पूल बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता व्यवस्थित न अडवल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे, कराड - रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील उंडाळे गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे. रविवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे येथील पुनर्वसित वसाहतीत राहणारे जाणू भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटणे आणि दगडू बिरू झोरे हे तिघेजण यामार्गे दुचाकीवरून ट्रीपल सीट भेंडवडेकडे जात होते. यावेळी नेहमीच्याच रस्त्याने जात असताना पुलाचे बांधकाम सुरू आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दुचाकी थेट पुलात कोसळली. या अपघातात जाणू भैरु झोरे, कोंडीबा भागोजी पाटणे हे दोघे जागीच ठार झाले तर दगडू बिरू झोरे हे गंभीर जखमी झाले. रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह आणि दुचाकी कराड ग्रामीण पोलिसांनी बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: निवृत्तीच्या आधी न्यायाधीशांनी नेमकं काय केलं? CJI सूर्यकांत यांनी व्यक्त केली चिंता, न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचार?

Ashes Test: नॅथन लायनमुळे चिडला Glenn McGrath; हात वर केले, फेकायला खूर्ची उचलली अन्... Video Viral

Code of Conduct : आचारसंहितेबाबत आयुक्तांचा इशारा; उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

जी राम जी! विधेयकामुळे राज्यावर आर्थिक भार, आधीच तिजोरीवर ताण त्यात आणखी खर्च वाढणार

SCROLL FOR NEXT