Airplane flight from Kolhapur for a passenger 
कोल्हापूर

फक्त एका प्रवाशासाठी कोल्हापुरातून केले विमानाने उड्डाण...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळावरून फक्त एका प्रवासासाठी कोल्हापूर ते तिरुपती ही विमानसेवा सुरू ठेवत इंडिगो  एअरलाइन्स व कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तिरुपती देवस्थान समितीने भाविकांना तिरुपती दर्शन बंद केल्यानंतर जवळपास सर्वच प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केली. परंतु निर्धारीत तिरुपती कोल्हापूर व कोल्हापूर तिरुपती विमान सेवा इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी फक्त एका महिला प्रवाशाचे तिकीट रद्द न झाल्याने सुरु ठेवली. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्स, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे विमानतळ संचालक कमल कटारिया व कर्मचारी यांनी या नफा तोट्याच्या गणितापेक्षा ग्राहकाभिमुख सेवेसाठी सिव्हिल एव्हिएशन चे डायरेक्टर जनरल विशाल भार्गव व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

दरम्यान बुधवार (ता. २५) पासून कोल्हापूर विमानतळावरील विमानसेवा आपत्कालीन विमानसेवा वगळता प्रवासी विमान सेवा बंद असून मंगळवार (ता.२४) रोजी विमानसेवा नेहमी सुरू होती. मंगळवारी कोल्हापूरहून तिरूपती, हैदराबाद,बेंगलोर या शहरांना विमानसेवा सुरू होती मात्र मुंबईची विमानसेवा बंद होती.कोल्हापुरात यावेळी एकूण २२० प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Marathi News Live Updates : मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

SCROLL FOR NEXT