कोल्हापूर

कोल्हापूर: प्रांताधिकाऱ्यांसमोरच जोरदार राडा; शेतकरी संघटना आक्रमक

शियेत प्रांताधिकाऱ्यांसमोरच राडा

सकाळ वृत्तसेवा

खडाजंगीचे चित्रीकरण करणार्‍या माध्यम प्रतिनिधींसह सर्वच पत्रकारांना बाहेर काढले.

शिये (कोल्हापूर) : शियेची सर्वपक्षीय पुनर्वसन समिती व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांची करवीर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी यांच्या समोर खडाजंगी झाली. या खडाजंगीचे चित्रीकरण करणार्‍या माध्यम प्रतिनिधींसह सर्वच पत्रकारांना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी बाहेर काढले. बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत संबंधित जागेची शासकीय मोजणी करुण तेथे पुनर्वसन शक्य असेल तर होईल, अन्यथा पर्यायी जागेचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर करावा असे ठरले असल्याचे सांगितले.

शिये ( ता. करवीर ) येथील सर्वपक्षीय पुनर्वसन समिती व शेतकरी संघटनेतील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय समितीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदन दिले होते. मंत्री पाटील यांनी यामध्ये तत्परता दाखवत आज शासकीय सुट्टी असताना देखील प्रांत, तहसिलदार, मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दुपारी बाराच्या सुमारास करवीर प्रांताधिकारी यांच्या दालनात ही बैठक सुरू झाली. अवघ्या पाच मिनिटांनी या बैठकीचे रुपांतर ग्रामसभेत झाले. त्यामुळे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी गावसभा घ्यायची असेल तर गावात जावा असे सुनावले.

सुरवातीला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड माणिक शिंदे यांनी आपले म्हणणे मांडत स्थळ पाहणी करावी, सर्वे क्रमांक २५९ आणि २८३ रिकामी जागा शासनाने ताब्यात घेऊन तेथे पुनर्वसन करावे, गुरव खडी येथील सध्याची भौगोलिक परिस्थिती नागरी वसाहतीसाठी योग्य नाही असे सांगितले. शिवाय ग्रामसेवक, तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर आरोप केले.

कृती समितीच्या वतीने जयसिंग पाटील म्हणाले, पुनर्वसन व्हावे हीच गावची इच्छा आहे. कागदोपत्री रिकाम्या जागेत अतिक्रमण आहे. काही भूखंड धारकांना मिळालेल्या जागेत आर्थिक परिस्थितीमुळे बांधकाम करता आले नाही. शिवाय अज्ञानामुळे काहींना आपले भूखंड कागदोपत्री नोंदवता आले नाहीत. सद्या ७६० पुरग्रस्तांचे पंचनामे झाले आहेत असे सांगून गावातील अधिकार्‍यांचे काम चांगले असल्याचा उल्लेख त्यांनी शेवटी केला. त्यांच्या याच मुद्द्यावरून अॅड माणिक शिंदे संतप्त झाले आणि त्यांचे समर्थक व कृती समितीचे पदाधिकारी यांच्यात वादावादी सुरू झाली. त्यामुळे वाद घालणाऱ्या दोन्ही पक्षकारांच्या समर्थकांना बाहेर काढण्याऐवजी प्रांताधिकारी यांनी वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींनाच बाहेरचा रस्ता दाखवला.

यावेळी करवीरच्या तहसिलदार शीतल मुळे - भांबरे, सरपंच सौ. रेखा जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष सर्जेराव काशिद, जिल्हा परिषद माजी सदस्य बाजीराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य जयसिंग काशिद, माजी सरपंच रणजित कदम, विकास चौगले, प्रभाकर काशिद, तेजस्विनी पाटील, पांडुरंग पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20I : हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन; दोन वर्षांनंतर तगडा खेळाडू परतणार, भारताची संभाव्य Playing XI

Crime News : शेजाऱ्याशी संबंध ठेवताना लेकरानं पाहिलं, आईनं पोटच्या पोराला संपवलं; पोलीस पतीने...

Dada Bhuse : "हिंदुत्वाशी तडजोड नाही, पण इस्लाम पक्ष सेक्युलर"; दादा भुसेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : पुण्यात उद्या सायकल स्पर्धेनिमित्त काही रस्ते बंद

Vasant Panchami 2026: वसंत पंचमीचा खरा आनंद अनुभवायचा आहे? भारतातील 'या' 5 ठिकाणांना आजच भेट द्या

SCROLL FOR NEXT