Assistant Director of Education Subhash Chowgule press conference kolhapur 
कोल्हापूर

अकरावी प्रवेश प्रक्रियेला पुन्हा सुरुवात: एस.ई.बी.सी स्थगितीमुळे कट ऑफ वाढला 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गातून (एस.ई.बी.सी) अकरावीसाठी अर्ज घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने एस.ई.बी.सी प्रवर्गाला स्थगिती दिल्याने यामधील 12 टक्के जागांचा समावेश खुल्या प्रवर्गात करण्यात आला. यामुळे खुल्या प्रवर्गातील कट ऑफ लिस्ट गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच ते तीन टक्‍यांनी वाढली.

विज्ञान विषयाचा कट ऑफ 93 टक्के, वाणिज्य (इंग्रजी माध्यम) कट ऑफ 93.40 टक्के, वाणिज्य (मराठी माध्यम) 80.40 टक्के तर कला शाखेचा कट ऑफ 76.80 टक्के झाला. एकूण आलेल्या अर्जापैकी 9,588 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तर 2736 विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार आहे. अशी माहिती सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 


कोरोना आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश यामुळे रेंगाळलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली. समितीने आज अंतिम यादी ऑनलाईन जाहीर केली. विद्यार्थी आणि पालकांना एस.एम.एस पाठवून त्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे याची माहिती कळवण्यात आली. या वर्षी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडे 14680 जागांसाठी 12691 अर्ज आले होते. यामधील 9588 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला. तर 2,736 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळणार असून एकही विद्यार्थी प्रवेशावीना राहाणार नाही. असे चौगुले यांनी सांगितले.

प्रवेश समितीकडे कला शाखेसाठी 1,736 अर्ज आले होते. त्या सर्वांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला. वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेसाठी 2317 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्या सर्वांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला. वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेमध्ये 1146 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला मात्र अर्ज केलेल्यांपैकी 644 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. विज्ञान शाखेसाठी 6822 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील 4532 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. 2092 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. अर्ज केलेल्या 12691 विद्यार्थ्यां पैकी 9588 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून 2736 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित झाला आहे त्यांनी मंगळवार (ता.8) पर्यंत 10.00 ते 5.00 यावेळेत आवश्‍यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. 


प्रवेश समितीकडे असलेल्या जागांमध्ये 26 टक्के जागा या खुल्या वर्गासाठी होत्या. यंदा पहिल्यांदात एस.ई.बी.सी प्रवर्गासाठी 12 टक्के जागा ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1228 विद्यार्थींनी अर्ज केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एस.ई.बी.सीला स्थगिती दिल्याने यामध्ये असलेल्या 12 टक्के जागांचा समानेश खुल्या प्रवर्गात करण्यात आला. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली. परिणामी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ वाढला. 

वाणिज्य शाखेकडे ओढा अधिक 
विज्ञान आणि कला शाखेपेक्षा वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे कट ऑफ लिस्ट वरून दिसून येते. वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेचा कट ऑफही विज्ञान शाखेपेक्षा जास्त आला आहे. 

ऑनलाईन तक्रार 
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेशा संबंधी कोणताही तक्रार असेल त्यांनी www.dydekop.org या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवावी. अन्य कोणत्याही प्रकारे तक्रार स्विकारली जाणार नाही.

संपादन- अर्चना बनगे  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT