बोंडापासून वार्षिक १० कोटींहून अधिक उत्पन्न शक्य : भाग्यश्री फरांदे sakal
कोल्हापूर

बोंडापासून वार्षिक १० कोटींहून अधिक उत्पन्न शक्य : भाग्यश्री फरांदे

चंदगड, आजरा, गडहिंग्लज व भुदरगडला लाभ श‍क्य

सकाळ वृत्तसेवा

चंदगड : काजू बोंडावर प्रक्रिया करुन त्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवता येतात. त्यासाठी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास चंदगड, आजरा, गडहिंग्लज व भुदरगड तालुक्यात वर्षाला दहा कोटींहून अधिक उत्पन्न मिळू शकते, असे मत उपविभागीय तालुका कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी मांडले. शिरगाव (ता. चंदगड) येथे तालुका कृषी खात्याच्या सभागृहात शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी केरळ येथील डॉ. जलजा मेनन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काजूच्या बोंडावर प्रक्रिया करुन बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखवले.

हिरव्या बोंडाची भाजी, काजूचे मोड, ब्रायीन सोलुशन काजू, सूप पावडर, पाकातील काजू, वाळलेला हिरवा काजू, डीटॅनीन प्रक्रिया करुन सिरफ, पल्प, कॅंडी, सरबत, सोडा, जॅम, जेली, लोणचे, चॉकलेट आदी पदार्थ कसे तयार केले जातात, याची माहिती देण्यात आली.फरांदे म्हणाल्या, ‘‘बोंडामध्ये ५५ ते ७५ टक्के रसाचे प्रमाण असते. त्यातील पोषण तत्त्वे संत्री, मोसंबी पेक्षाही ‘क’ जीवनसत्त्व अधिक असल्याने ते पोषणदायी फळ म्हणून वापरता येते. त्यातील टॅनीनमुळे तुरट चव लागते. हा तुरटपणा कमी करण्यासाठी संशोधन चालू असल्याचे सांगण्यात आले. पवार यांनी यासंदर्भात गोवा येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर या विभागातील शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून त्यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

या चार तालुक्यांत सुमारे आठ हजार हेक्टरवर काजूचे पीक आहे. त्यापासून सुमारे ४० हजार टन काजूचे बोंड उत्पादित होते. त्यापैकी अल्प प्रमाणात गोवा येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. उर्वरित फळे जाग्यावर सडून जातात. त्यावर प्रक्रिया केल्यास रोजगार आणि अधिकचे उत्पन्न मिळेल. सद्यस्थितीत एक हजार टन बोंडाची विक्री होते. त्यापासून पाच लाख रुपये उत्पन्न मिळते. भविष्यात १० हजार टनांवर प्रक्रिया केली तरी त्यापासून दहा कोटी रुपये उत्पन्न शक्य आहे.’’ या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे, मंडल कृषी अधिकारी विजय गंबरे उपस्थित होते.

कृषी विभाग सिरपचे ब्रॅंडिंग करणार

दरम्यान, सुंडी येथील शेतकरी उत्पादक गटाने बोंडांवर प्रक्रियेसाठी पुढाकार दर्शवला. या वेळी म्हाळेवाडी येथील लतिका कोकीतकर यांनी बोंडापासून बनवलेला सिरप सादर केला. कृषी विभागातर्फे त्याचे ब्रॅंडिंग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनचं वादळ... ११ चौकार अन् ४ षटकार! सूर्या दादासोबत १२२ धावांची भागीदारी अन्...

Pune Grand Tour: ''सायकल स्पर्धेमुळे पुण्यातील वाहतुकीवर फारसा ताण नाही'', पुणे पोलिस नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

MSCE Exam 2026 : प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाची विभागीय स्पर्धा परीक्षा ३-४ फेब्रुवारीला ऑनलाईन

Pune Crime News : ई-सिगारेट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर विक्रेत्यांवर छापे, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT