कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या-त्या तालुक्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता व सोशल मीडियावर प्रचार आणि प्रसार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही समिती नियुक्त केली आहे.
गावागावांत आचारसंहिता भंग होणाऱ्या घटना, कार्यक्रम, पार्टी, तसेच सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश पाठविणाऱ्यांना चाप लावला जाणार आहे. दरम्यान, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार सदस्य म्हणून काम करतील. हे सर्व सदस्य जिल्ह्यातील ज्या-त्या तालुक्यातील संवेदनशील गावांसह सर्वच गावांतील चांगल्या-वाईट घटनांवर नजर ठेवतील. आचार संहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत.
दरम्यान, गावातील पोलिसपाटील यांनी गावातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवावे. आचारसंहिता भंग करणाऱ्या घटनांची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी. तसेच, गावपातळीवर शांतता आणि सुरक्षितता कशी राहील, याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शी आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह सर्वच घटकांनी दक्ष राहिले पाहिजे. जेवणावळी किंवा रात्री उशिरापर्यंत परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर समिती सदस्यांनी लक्ष ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
आचारसंहितेचा भंग झाल्यास कडक कारवाई
जिल्ह्यात ज्या गावांतील ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, अशा ठिकाणी आचार संहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे जेवणावळी किंवा आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर पाठविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.