corona positive patient dead in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

मोठी बातमी ; अंत्यसंस्काराहून परतत असताना त्याला कोरोना असल्याचे समजले अन्...

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : अत्यवस्थ असलेल्या येथील गावभागातील नागरिकास उपचारास नेताना त्याचे निधन झाले. सायंकाळी नातेवाईकांनी इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले आणि अंत्यसंस्कारातून नागरिक परतत असतानाच मयत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला. त्यामुळे गावभागात प्रचंड खळबळ माजली आहे. अंत्यसंस्काराला हजर असलेल्या वीस जणांना पंचगंगा स्मशानभूमीतच रोखून ठेवले असून पाच जण तीव्र संपर्कात आले आहेत. 


शहरातील गावभाग येथील अवधुत आखाडा (त्रिशुल चौक) या परिसरातील एक व्यक्ती गेले तीन-चार दिवस आजारी होती. आज या व्यक्तीची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी येथील शासनाच्या आयजीएम सामान्य रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात नेण्यात येत होते. मात्र उपचारापूर्वीच या व्यक्तीचे निधन झाले. 

तापसह अन्य संशयीत आजार असल्यामुळे या व्यक्तीचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात रूग्णालयाने हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. नातेवाईकांनी सायंकाळी येथील पंचगंगा नदी काठावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार सुरू असतानाच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यामुळे गावभागात प्रचंड खळबळ माजली आहे.

दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना तातडीने प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Raigad Flood: भेरव अंबा नदीचा पूल पाण्याखाली; रायगडमधील आदिवासी गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

SCROLL FOR NEXT