हुपरी : परिसरातील गावांची लोकसंख्या वाढल्याने आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे येथे ग्रामीण, तर रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. हुपरी परिसरातील लोकसंख्या वाढ, शहरीकरण, औद्योगीकरण आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता सर्वसोयीनीयुक्त, असे ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मागणीबाबत राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
हे पण वाचा - इच्छुकांची समजूक काढताना होतेय दमछाक
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर, गौरव नायकवडी उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.