The Director General appreciated to Kolhapur Police 
कोल्हापूर

शब्बास... कोल्हापूर पोलिस, मुंबईत होणार सत्कार...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - किणी टोल नाक्कायावर झालेल्या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिसांचा राज्याचे पोलिस महासंचालक मुंबईत सत्कार करणार आहेत. त्यासाठी या पथकाला तीन फेब्रुवारी रोजी मुंबईत निमंत्रण देण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर तातडीने त्याची माहिती महासंचालकांना देण्यात आली. त्यांच्या वतीने ही माहिती राजस्थान पोलिसांना कळविण्यात आली. अतिशय खतरनाक गॅंग म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा गॅंगमधील गुन्हेगारांना जिवाची पर्वा न करता कोल्हापुरात पकडल्याची राज्याच्या पोलिस महासंचालकांनी तत्काळ दखल घेतली व त्यांना सत्कारासाठी तीन फेब्रुवारीला मुंबईला पाठवावे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना कळवले. श्री. वारके यांनी घटनास्थळी येऊन या पथकाचे कौतुक केले व तीन तारखेच्या मुंबईतील भेटीची माहिती दिली.

कारवाईचे शिलेदार...

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, सत्यजित घुले, पोलिस कर्मचारी नामदेव यादव, पांडुरंग पाटील, रणजित कांबळे, सुरेश पाटील, संतोष माने, सुनील इंगवले, चंदू ननवरे, सुभाष वरूटे, नितीन चौथे, सुजय दावणे, वैभव पाटील, सचिन पाटील आदी या कारवाईचे शिलेदार ठरले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT