light latur sakal
कोल्हापूर

जि. प.च्या ६२ शाळांची बत्ती गुल

थकबाकी गेली साठ लाखांवर; ११७७ कनेक्शन अखंडीत

युवराज पाटील-सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वीज बिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या ६२ शाळांचे वीज कनेक्शन कायमचे, तर ८६ शाळांचे तात्पुरत्या स्वरुपात तोडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शैक्षणिक विद्युत उपकरणे वापरता येत नाहीत. शाळांची वीज बिल भरण्यासंबंधी आर्थिक तरतूद असते की नाही असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्यभरात सध्या थकित वीज बिलापोटी महावितरणने कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात जि.प.शाळांकडे १३२५ वीज कनेक्शन आहेत. सध्यस्थितीत ११७७ कनेक्शनचा वीजपुरवठा सुरू आहे. तोडलेल्या ८६ वीज कनेक्शनची थकबाकी ६ लाख ५६ हजार इतकी आहे, तर ६२ कनेक्शनपैकी ८६ हजार ७७२ इतकी थकबाकी आहे. ११७७ कनेक्शन जरी सुरू असली तरी त्यांची ५४ लाख २४ हजार इतकी थकबाकी आहे.

जिल्हा परिषदेच्या सुमारे दोन हजाराहून अधिक शाळा आहेत. विद्यार्थी संख्या सुमारे पावणेदोन लाखांवरती आहे. केंद्रीय बोर्ड तसेच इंग्रजी शाळांच्या बोलबाल्यातही जि. प. शाळांनी गुणवत्ता दाखविली आहे. पूर्वी चौथी तसेच सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळांतील विद्यार्थीच राज्याच्या गुणवत्ता यादी झळकायचे. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी दरवर्षी उपक्रम राबविले जातात. मध्यंतरी इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांनी जि. प. शाळांत प्रवेश घेतला. यावरून शाळांची गुणवत्ता सिद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भात पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी; मुळशी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT