e passes are still compulsory in kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात ई-पासची सक्ती कायम ; काय आहे कारण?

सुनील पाटील

कोल्हापूर : एका जिल्ह्यातून किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी सुरु असणारे ई-पास रद्द करण्याच्या सूचना केंद्रीय गृहसचिवांनी दिले आहेत. मात्र, राज्यात अजून या निर्णयाची अमंलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी एका-जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी खासगी वाहनांना ई-पास सक्तीचाच आहे. 

राज्यातील आणि परराज्यातील प्रवासासाठी ई-पास घेतला जात होता. लोकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचा केला आहे. दरम्यान, काल गृहसचिवांनी हे सर्व ई पास रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातही ई-पास रद्द झाले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार, अशी पोस्ट सोशलमिडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. 

आजही या पोस्ट अविरतपणे मोबाईलच्या अलर्ट टोन वाजवत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने सध्या तरी ई-पास रद्द केलेला नाहीत. त्यामुळे एस.टी. बस वगळता इतर खासगी वाहनांना ई-पास अजूनही सक्तीचाच आहे. काल रात्री उशीरापर्यंत आणि आज सकाळीही ई-पास रद्दच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. 

अद्याप सुचना नाहीत 

"राज्य शासनाकडून ई-पास रद्दच्या कोणत्याही सूचना जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी ई-पास सुरुच राहतील. ज्यावेळी ई-पास सुचना येतील त्यावेळी, याची माहिती दिली जाईल."

- जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने घेतला गळफास

Ranji Trophy: जैस्वालचे अर्धशतक, मुशीर खानही लढला; पण मुंबईचा संघ पहिल्याच दिवशी गडगडला

Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान

Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

SCROLL FOR NEXT