Farmers In 12 Flood-Hit Villages In Shirol Taluka Will Get Compensation Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शिरोळ तालुक्‍यातील पूरबाधित "एवढ्या' गावांतील शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, वाचा सविस्तर बातमी

गणेश शिंदे

जयसिंगपूर : ऑगस्टमध्ये आलेल्या पुरात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी दिले आहेत. शिरोळ तालुक्‍यातील 12 गावांतील नुकसानग्रस्त शेती पिकांच्या पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांची यासाठी नियुक्ती केली असून, लवकरच नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडे सादर केले जाणार आहेत. 

शिरोळ तालुक्‍यात गेल्या वर्षी महापुराने शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाकडून अद्याप भरपाई दिली जात आहे. यावर्षी कोरोनाचे संकट असतानाही प्रशासनाने पूरग्रस्त गावातील लोकांना विनंती करून महापुराची स्थिती निर्माण झाल्यास त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारी केली होती. सुदैवाने महापुराचा धोका टळला असला तरी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली होत्या. यातून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांत नदीकाठच्या घरांनाही पुराचा फटका बसला. 

पुराचा फटका बसलेल्या तालुक्‍यातील 12 गावांतील शेत जमीन आणि पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 26 ऑगस्टपर्यंत नुकसानीचे पंचनामे होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना आणि पंचनामे अशा दुहेरी कामाच्या कोंडीत सापडल्याने पंचनामे पूर्ण होण्यास विलंब लागला आहे. पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आठवडाभरात 12 गावांतील नुकसानीचे पंचनामे प्रशासनाला सादर होणार आहेत. 

संयुक्त मोहीम
पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्यासाठी महसूल, कृषी आणि पंचायत समितीच्या संयुक्त मोहिमेतून युद्धपातळीवर पंचनामे केले जात आहेत. तिन्ही विभागांच्या समन्वयातून पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 

या गावांना मिळणार लाभ 
अर्जुनवाड, कुरुंदवाड, दत्तवाड, हसूर, अकिवाट, मजरेवाडी, राजापूर, घोसरवाड, अब्दुललाट, शिरदवाड, शिरढोण, टाकवडे. 

वस्तुस्थिती पाहूनच पंचनामे
ऑगस्टमधील पुरामुळे नदीकाठच्या 12 गावांतील शेतीपिकांना फटका बसला आहे. अशा शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे आल्यानंतर भरपाईची प्रक्रिया होईल. महसूल, कृषी आणि पंचायत समितीतर्फे पंचनामे केले जात असून, फोटो व आवश्‍यक कागदपत्रे पंचनाम्याबरोबर असणार आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती पाहूनच पंचनामे होतील. 
- डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार, शिरोळ

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT