fire in cashew farming four farmers velvati ajara in kolhapur 
कोल्हापूर

आजरा : चार बागायतदारांच्या काजू बागांना आग; वेळवट्टीतील घटना

रणजीत कालेकर

आजरा (कोल्हापूर) : वेळवट्टी (ता. आजरा) येथे उंबराचे पाणी आणि सातवानचा माळ येथे लागलेल्या आगीत चार बागायतदारांच्या काजू बागांना आग लागली. दुपारी एक वाजता लागलेल्या आगीचे नेमके कारण समजले नाही. मात्र यात बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्याने आग विझवणे शक्य झाले.    

आंबोली मार्गावरील काजू भागामधून धुराचे लोट येत असताना वाहनधारकांना दिसले. त्यांनी ही बातमी तातडीने ग्रामस्थ आणि काजू बागायतदारांना कळवली. ग्रामस्थांसह काजू बागायतदारांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. काही काळाच्या प्रयत्नांतर आग विझवण्यात यश आले. दरम्यान या घटनेत आरती अभय कुरुंदकर, राजेश्वरी विजयकुमार पाटील, धनाजी गोवींद राणे, तानाजी विठोबा राणे यांच्या काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काजूच्या हंगामात झाडांना आगीची झळ बसल्याने उत्पादनात घट येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये अजित तुकाराम प्रभू यांच्या बांबूचेही नुकसान झाले आहे. पंधरा एकरपेक्षा जास्त परिसर या आगीत जळाला आहे. वाळलेला पालापाचोळा आणि कडक उन्हामुळे आग पसरत गेल्याने शेतकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT